शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे

By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST

जळगाव : समाजाच्या तळागाळापर्यंत रक्त सेवा पोहोचवण्यासाठी रक्तपेढींनी कटीबद्ध राहून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिलीप वाणी यांनी केले.

जळगाव : समाजाच्या तळागाळापर्यंत रक्त सेवा पोहोचवण्यासाठी रक्तपेढींनी कटीबद्ध राहून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिलीप वाणी यांनी केले.
माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी व इंडीयन मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर डॉ.दिलीप वाणी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव डॉ.अनिल पाटील उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतासह डॉ.स्नेहल फेगडे यांची सेंट्रल वर्किग कमिटी आय.एम. ए. दिल्ली येथे सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात रक्त संक्रमणाविषयी जबाबदारी या विषयावर डॉ.दिलीप वाणी यांनी रक्तसंकलन , रक्त पुरवठा तसेच रक्त पेढीसाठी लागणारे साहित्य घेतांना शासकीय कायदे व नियमांची माहिती दिली. रक्ताच्या गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून कायद्याची वाट न बघता आधुनिक तंत्रज्ञान रक्त पेढीने स्वीकारावे असे डॉ. वाणी यांनी सांगितले.
दुसर्‍या सत्रात डॉ.महेंद्रसिंग चव्हाण यांनी रक्ताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नॅट तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. सध्या भारतात प्रचलित एलिसा टेस्टींग व नॅट तंत्रज्ञानाची तुलना सांगितली. जनकल्याण रक्तपेढी पुणे तेथील डॉ. अतुल कुलकर्णी यांनी रक्तातील नवीन संशोधनाबद्दल माहिती सांगताना पहिल्या सख्या नात्यातील रक्त रुग्णांना देऊ नये तसेच मूत्रपिंड, फुफ्फूस इत्यादी अवयव प्रत्यारोपण करतांना रक्त देतांना घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती दिली.
शेवटच्या सत्रात डॉ. विवेकानंद कुळकर्णी यांनी स्रीरोग व बालरोग या क्षेत्रात वापरण्यात येण्यार्‍या रक्ताबाबत माहिती देऊन उपस्थित डॉक्टरांचे शंकानिरसन केले. डॉ.अर्जुन भंगाळे, भरत अमळकर यांनीही मनोगतच व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ.रवी हिरानी यांनी केले तर रक्तपेढीचे व्यवस्थापक भानुदास येवलेकर यांनी आभार मानले. १२० डॉक्टरांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलतर्फेडॉ. नंदन माहेश्वरी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी डॉ. धर्मेंद्र पाटील,डॉ.नलिनी वैद्य, किरण बच्छाव, तुफान शर्मा, विवेक पलोड, आनंद जोशी, मधुकर सैंदाणे, जयवंत पाटील, उज्वला पाटील, रश्मी नाटेकर यांनी परिश्रम घेतले.