शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

चाळीशीतील ब्लड प्रेशरमुळे नंतर होऊ शकतो स्मृतिभ्रंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 4:01 PM

पुरुषांच्या तुलनेत महिलांना मोठा धोका

ठळक मुद्देज्या महिलांना चाळीशीच्या दरम्यान हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर नंतरच्या आयुष्यात त्यांना विस्मृतीचा आजार होऊ शकतो.अशा महिलांना डिमेन्शियाचा धोका तब्बल ७५ टक्क्यांनी वाढतो.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणताही आजार आपल्याला त्याची पूर्वसूचना देत असतो. त्याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे.

- मयूर पठाडेकोणत्याही गोष्टीचं तरुणपणांत काहीच वाटत नाही. हिंमत असते, रिस्क घेण्याची तयारी असते, कोणत्याही गोष्टीला हिंमतीनं सामोरं जाण्याची जिद्द असते.. पण ही हिंमत आणि जिद्द नको तिथे दाखवली तर नंतरच्या काळात त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात.कॅलिफोर्निया येथील शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं. हे संशोधन खूपच महत्त्वाचं मानलं जातं. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी आणि विशेषत: महिलांसाठी हे संशोधन खूपच उपयोगी आहे.शास्त्रज्ञांनी मध्यम वयातील म्हणजे तिशीच्या पुढील जवळपास साडेसात हजार स्त्री पुरुषांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, ज्या महिलांना चाळीशीच्या दरम्यान हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर नंतरच्या आयुष्यात त्यांना विस्मृतीचा म्हणजेच डिमेन्शियाचा आजार होऊ शकतो.चाळीशीतील ज्या महिलांना हा त्रास नाही किंवा ज्या नॉर्मल आहेत, त्यांच्यापेक्षा हाय ब्लड प्रेशर असलेल्या महिलांना डिमेन्शियाचा धोका तब्बल ७५ टक्क्यांनी वाढतो असं शास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणताही आजार आपल्याला त्याची पूर्वसूचना देत असतो. त्याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. एवढ्याशा गोष्टीनं काय होतं किंवा होईल बरं आपोआप.. असा जर आपला दृष्टिकोन असला तर मात्र नंतर मात्र त्या गोष्टींवर उपचार करणं तर कठीण होतंच, पण बºयाचदा काही गोष्टी हाताबाहेर जातात.त्यामुळे शास्त्रज्ञांचा सर्व पुरुष आणि महिलांना सल्ला आहे, तरुण वयातच, खरं तर लहान वयापासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यांना चाळीशीत ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी वेळीच त्याकडे लक्ष देऊन उपचार घ्या.. नाहीतर नंतर तुम्हाला काहीच आठवणार नाही..