शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ; 'या' आजारांवर अधिक खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 09:05 IST

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा 'आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'चा लाभ अवघ्या वर्षभरात अनेकांनी घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींची संख्या 50 लाखांहून अधिक झाली आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रमुख आरोग्य योजनेमार्फत 32 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांच्या उपचारासाठी 7,901 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.    

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या आकड्यानुसार, 60 टक्क्यांहून अधिक निधी तृतीय श्रेणीतील उपचारांसाठी खर्च करण्यात आले  आहे. तृतीय श्रेणीत ज्या आजारांवर उपचार केले, त्यामध्ये कॉर्डिओलॉजी, ऑर्थोपॅडिक, रेडिएशन, ओंकोलॉजी, कार्डिओ-थोरॅसिक, वॅस्कुलर सर्जरी आणि युरोलॉजी संबंधीत होते.

आयुष्मान भारत योजनेला गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ आणि आंध्र प्रदेशातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, संपूर्ण देशात 18,486 रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. यामध्ये 53 टक्के खासगी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. तसेच, 50,000 अधिक पोर्टेबिलिटीची प्रकरणे सुद्धा समोर आली आहे. ज्यामध्ये प्रवासी, तसेच प्रवास करण्यास पात्र असलेल्या लोकांनी आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन या योजणेमार्फत उपचार करून घेतले आहेत.   

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय