शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोनानंतर आता गोवरचं संकट, ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:44 IST

मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं.

मुंबई - भारतात अचानक गोवरचा प्रकोप पाहायला मिळत आहे. ४८ तासांमध्ये ३ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याचं कळतंय. सध्या गोवर आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवर आजारावर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे या आजाराची लक्षणं जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. 

मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं. या केंद्रीय पथकात नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, पुणे येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. ज्याचं नेतृत्व डॉ. अनुभव श्रीवास्तव करत आहेत. TOI रिपोर्टनुसार, गोवर हा संसर्गजन्य रोग असून कमी काळात त्याचे २९ हून अधिक रुग्ण आढळले. 

अहवालानुसार, २९ संक्रमित मुलांपैकी जवळपास ५० मुलांना गोवरची लस देण्यात आली होती. ज्यात काही मुलांना ९ महिन्याहून कमी वयात ही लस दिली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटलं की, आम्ही गोवरच्या या प्रकोपाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत रिसर्च करत आहोत. गोवर व्हायरस कुठल्या स्ट्रेनमुळे आलाय का याचा शोध घेतला जात आहे. 

काय आहेत गोवरची लक्षणे?सीडीसीनुसार, गोवरचा धोका सर्वाधिक लहान मुलांना आहे. संक्रमितांच्या संपर्कात येताच ७ ते १४ दिवसांमध्ये या आजाराची ४ प्रमुख लक्षणे दिसतात. त्यात १०४ डिग्रीपर्यंत ताप, खोकला, नाकातून सर्दी वाहणे, लाल डोळे, डोळ्यातून पाणी येणे. जेव्हा संक्रमित मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसतात त्यानंतर २-३ दिवसांत तोंडात छोटे छोटे सफेद डाग येतात. शरीरावर लाल रंगाच्या खूणा दिसतात. गोवरपासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण, अद्याप या रोगावर कुठलेही औषध नाही. संक्रमित मुलांची काळजी घेणे, दुसऱ्या मुलांपर्यंत जाण्यास रोखणे, पाणी, ज्यूस पाजणे, स्वच्छता ठेवणे यासारखे उपचार करायला हवेत.