शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

नाव आठवत नाही? वरण-भात, भाजी-पोळी खा!; अमेरिकेच्या संशोधनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:26 IST

पाश्चात्त्य आहारपद्धतीचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अल्झायमर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे

नवी दिल्ली : पाश्चिमात्य आहारपद्धतीच्या तुलनेत भारत, जपान, चीनसारख्या देशांमध्ये प्रचलित असलेल्या पारंपरिक आहारपद्धतीमुळे अल्झायमर होण्याचा धोका कमी होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे.

अमेरिकेतील सनलाइट, न्यूट्रिशिअन अँड हेल्थ रिसर्च सेंटरने हे संशोधन केले. त्याबाबत जर्नल ऑफ अल्झायमर डिसिज या नियतकालिकात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, पाश्चात्त्य आहारपद्धतीचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अल्झायमर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे

फारशा शारीरिक हालचाली नसणे धोकादायकसंशोधकांनी म्हटले आहे की, फारशा शारीरिक हालचाली न करणे तसेच स्थूलता यांच्यामुळे अल्झायमर होण्याचा धोका वाढतो. आपली जीवनशैली तसेच आहारपद्धती या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे लोकांनी चुकीच्या जीवनशैलीचा अंगीकार करणे टाळले पाहिजे. वनस्पतीजन्य आहारपद्धतीमुळे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात, असेही संशोधकांनी सांगितले.

मधुमेह का वाढतो?प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे स्थूल तसेच मधुमेह होण्याचा धोका वाढतो. अल्झायमर होण्यासाठी हे खाद्यपदार्थ कारणीभूत ठरू शकतात. वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांमध्ये असलेले व अल्झायमरला दूर ठेवणारे घटक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये आढळून येत नाहीत, असे हार्वर्ड विद्यापीठातील न्यूट्रिशिअन, प्रा. एडवर्ड गिओवानुस्सी यांनी सांगितले.

काय खाल तर वाढेल धोका?चरबीयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाणात होणारे सेवन, रेड मीट (लाल मांस), हॅम्बर्गर, बार्बेक्यू, हॉट डॉग्ज, साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ अशा गोष्टी आहारात असतील तर त्यामुळे अल्झायमर आजार होण्याचा धोका वाढतो. मीटमुळे शरीरात इन्सुलिनला प्रतिरोध, जळजळ अशा अनेक गोष्टींमध्ये वाढ होऊन हा आजार होण्याची शक्यता वाढते. मात्र, हिरव्यागार भाज्या, फळे तसेच भाज्या, ओमेगा-३ फॅटी असिड, विविध प्रकारची धान्ये यांच्यामुळे अल्झायमर होण्याचा धोका कमी होतो, असे या संशोधनातील निष्कर्षांत म्हटले आहे