शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’च देईल गोरगरीब विद्यार्थ्यांना आधार

By admin | Updated: June 23, 2014 00:09 IST

दहावीचा निकाल नुकताच लागला. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली. परंतू प्रथम श्रेणीत (६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्य

अकरावीसाठी प्रवेश : अनुदानित शाळांतही घेतात मोठे शुल्क नरेश रहिले - गोंदियादहावीचा निकाल नुकताच लागला. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली. परंतू प्रथम श्रेणीत (६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे हव्या त्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे अशक्य होत आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे गरीब असो की गुणवंत, खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘डोनेशन’ दिल्याशिवाय प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद किंवा नगरपरिषदेच्या शाळांची वाट धरावी लागणार आहे.जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणाऱ्या २५४ शाळा अनुदानित आहेत. या अनुदानित शाळांमध्ये ३१६ तुकड्या आहेत. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय तिरोडा तालुक्यात ३१, आमगाव तालुक्यात २२, सालेकसा तालुक्यात २०, देवरी तालुक्यात ३१, सडक/अर्जुनी तालुक्यात २६, अर्जुनी/मोरगाव तालुक्यात ४०, गोरेगाव तालुक्यात २३ व गोंदिया तालुक्यात ६१ आहेत. या सर्व शाळांमध्ये अकरावीला प्रवेश देणाऱ्या तुकड्या ३१६ आहेत. यात कला शाखेच्या १९१ तुकड्या, विज्ञान शाखेच्या १०२ तुकड्या, वाणिज्य शाखेच्या १६ तुकड्या तर संयुक्त शाखांच्या सात तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये ^६० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो. जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशाची एकूण क्षमता २१ हजार ४८० विद्यार्थ्यांची आहे. यावर्षी जिल्ह्यातील १९ हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे पुरेशा प्रमाणात अकरावीच्या जागा उपलब्ध आहेत. तरीदेखील खासगी आणि नावाजलेल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवत्तेऐवजी ‘डोनेशन’ हाच निकष अनेक ठिकाणी लावल्या जात आहे. यातून गोरगरीब विद्यार्थ्यांना इच्छा असूनही त्या शाळांमध्ये प्रवेश घेणे अशक्य होत आहे.विज्ञान शाखेच्या १०२ तुकड्यांमध्ये सात हजार विद्यार्थी, वाणिज्य शाखेच्या १६ तुकड्यांमध्ये ६२५ विद्यार्थी, कला शाखेच्या १९१ तुकड्यांमध्ये १० हजार ८०० विद्यार्थी तर संयुक्त शाखेच्या सात तुकड्यांमध्ये ४९० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.दहावीच्या निकालात २४३३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तर ७८२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले. प्रथम श्रेणी व प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्यांचा कल विज्ञान शाखेकडे आहे. विज्ञान शाखेच्या १०२ तुकड्यांसाठी १० हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजन आहे. मात्र प्रत्यक्षात दोन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन शकणार नाही. याचाच फायदा घेत अनेक अनुदानित शाळांमध्ये प्रवेश शुल्काच्या नावावर आर्थिक शोषण केले जात आहे. चांगले गुण घेऊनही एखाद्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला त्या शाळेत केवळ डोनेशन देण्याची तयारी नाही म्हणून प्रवेश दिला जात नाही. अनुदानित असलेल्या काही शाळांनी विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. मात्र पालक वर्ग हा अन्याय मुकाट्याने सहन करीत आहे. आपल्या मुलाला गावाच्या परिसरातील किंवा नजीकच्या गावातील शाळेत प्रवेश मिळावा हा पालकांचा उद्देश असतो. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी रक्कम पालकांना मोजावी लागत आहे. प्रवेश शुल्क परीक्षेसाठी प्राचार्य व शिक्षकांशी बाचाबाची केली तर प्रवेश मिळाल्यानंतरही आपल्या पाल्याचे गुण कमी करून त्याला नापास करण्याचा प्रयत्न तेथील मुख्याध्यापक करतील अशी धारणा ठेवून या आर्थिक शोषणाविरूध्द पालक आवाज उठवित नाहीत. याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये अकरावीत प्रवेश देतांना प्रवेश शुल्काच्या नावावर पालकांच्या खिशातून पाच ते ३० हजाराची रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याने हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.