शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

झेडपीचे विदर्भवीर येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:31 IST

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात १ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य : सीईओदेखील लावणार थम्ब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात १ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. या नियमाची काटेकोरपणे अमलबजावणी केली जाणार असून स्वत: सीईओ बायोमेट्रिकवर कार्यालयीन वेळेत थम्ब करणार आहे. या निणर्यामुळे झेडपीच्या विविध विभागाचे विदर्भवीर खातेप्रमुख व कर्मचारी अडचणी येणार आहेत.शासनाने सर्वच शासकीय कार्यालयांना बायोमेट्रिक मशिन्स लावण्याचे निर्देश दिले आहे. या बायोमेट्रीक मशिन्स शासनाच्या एनआयसी या सॉफ्टवेअरशी कनेक्ट असणार आहे. बायोमेट्रिक मशिन्समध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजिस्टेशन व थम्ब घेण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बायोमेट्रिक मशिन्स लावण्याचे काम पूर्ण झाले आहे.बायोमेट्रिकमध्ये जि.प.च्या ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या रजिस्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुध्दा येत्या दोन तीन दिवसात पूर्ण होणार आहे. येत्या १ एप्रिलपासून बायोमेट्रिकवर हजेरी लावणे सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले आहे. त्यामुळे जि.प.च्या अधिकारी व कर्मचाºयांना सकाळी ९.४५ व सायंकाळी ५.४५ वाजता या कार्यालयीन वेळेत आल्यावर आणि जाताना थम्ब करावे लागणार आहे.विशेष म्हणजे यापूर्वी देखील जि.प.मध्ये बायोमेट्रिक मशिन्स लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या शासनाच्या एनआयसी या सॉफ्टवेअरशी कनेक्ट नव्हत्या. शिवाय कुणीच फारसे गांभीर्याने घेत नव्हते. जि.प.चे काही विभागप्रमुख विदर्भ एक्स्प्रेसने येत असल्याने त्यांचे अधिनस्त कर्मचारी सुध्दा त्यांचा कित्ता गिरवित असल्याचे चित्र होते.त्यामुळे शासकीय कार्यालयांची वेळ जरी सकाळी ९.४५ वाजताची असली तरी ११:३० शिवाय प्रत्यक्षात कामाला सुरूवात होत नव्हती. ही पंरपरा केवळ जि.प.मध्येच नव्हे तर विविध शासकीय कार्यालयांमध्ये कायम आहे.त्यामुळे विदर्भ ठरविते गोंदियातील शासकीय कार्यालयांची वेळ असे विनोदाने म्हटले जाऊ लागले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या अपडाऊन संस्कृतीचा फटका शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसत होता. मात्र उशीरा का होईना प्रशासनाने याची दखल घेत बायोमेट्रीक हजेरी अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याना गाडीची येण्याजाण्याची वेळ बदलावी लागेल अथवा गोंदिया येथे भाड्याने घर घेवून रहावे लागले.विशेष म्हणजे नियम केवळ कर्मचाऱ्यानाच का ? वरिष्ठ अधिकाºयांना सूट का दिली जाते असा सवाल नेहमीच उपस्थित केला जातो. त्यामुळे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांनी १ एप्रिलपासून स्वत: नियमित बायामेट्रीकवर हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी सुध्दा याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी सूचना विभाग प्रमुखांना केली आहे.दौरा संस्कृतीला लगामजिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात दौरा दाखवून प्रत्यक्षात दुसरीकडे राहत होते. मात्र आता दौरा संस्कृतीला सुद्धा ब्रेक लागणार आहे. अधिकारी अथवा कर्मचारी ज्या गावाच्या दौºयावर असतील त्या ग्रामपंचायतमधील बायोमेट्रिकवर त्यांना थम करणे अनिवार्य आहे. या थम्बची नोंद एनआयसी या सॉफ्टवेअरमध्ये नोंद होणार असून त्यावरुन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन निघणार आहे.वेतन कपात, सीआरवर नोंदजि.प.च्या कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्याची नियमित पडताळणी केली जाणार आहे. जे अधिकारी व कर्मचारी निर्धारित वेळेत उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे वेतन कपात व शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद