शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

आमदारांच्या एकीच्या बळाने जि.प.सीईओची गेली विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डांगे यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले. दवनीवाडा येथील शाळा बांधकामाचे चौकशी प्रकरण असो वा शिक्षकांच्या निलंबनाचा विषय त्यांनी नेहमीच एकांगी भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांना भोवली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे विरुद्ध आणि आमदार असा गुप्त संघर्ष सुरू होता. या संघर्षात शिक्षक आणि ग्रामसेवकांच्या आंदाेलनाची भर पडली. डांगे यांनी आमदारांवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वरचढपणा करणे त्यांना भाेवला. त्यामुळे जिल्ह्यातील चारही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना गाठून डांगे यांची थेट तक्रार केली.  यानंतर गुरुवारी (दि.२७) डांगे यांच्या बदलीचे आदेश धडकले. त्यामुळे आमदारांचे एकीचे बळ अन् सीईओंची विकेट गेल्याचा अनुभव जिल्हावासीयांना आला. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डांगे यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले. दवनीवाडा येथील शाळा बांधकामाचे चौकशी प्रकरण असो वा शिक्षकांच्या निलंबनाचा विषय त्यांनी नेहमीच एकांगी भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांना भोवली. त्यातच ग्रामसेवकांचे निलंबन प्रकरणसुद्धा चांगलेच भोवले. जि. प.मुख्य कार्यकाऱ्यांविरुद्ध ग्रामसेवकांनी प्रथमच एवढी उघड भूमिका घेतली. याचा संदेशसुद्धा मुंबईपर्यंत गेला. शिवाय त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून काही वादग्रस्त प्रकरणे भोवली. केवळ विरोधी नव्हे, तर सत्ता पक्षाच्या आमदारांनीसुद्धा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसमोर डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. तेव्हापासूनच त्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले होते. त्यांच्या बंगल्यावरील बागेत एका अधिकाऱ्याने टाकलेल्या सेंद्रिय खताच्या प्रकरणाची चर्चासुद्धा चांगली होती. ही सर्वच प्रकरणे डांगे यांच्या बदलीस कारणीभूत ठरली. असो, पण शेवटी या निमित्ताने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांचे एकीचे बळ फळाला आले म्हटल्यास वावगे होणार नाही. हीच भूमिका यापुढे कायम ठेवल्यास निश्चितच जिल्ह्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल हे कुणीही नाकारू शकत नाही. 

त्या प्रकरणाची चौकशी कराच केवळ विरोधी पक्षाचे नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीसुद्धा काही प्रकरणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता त्यांची बदली झाली म्हणून या प्रकरणावर पडदा न टाकता या प्रकरणाची सखोल चौकशी करून एकदा ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाऊ द्या.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद