शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

आमदारांच्या एकीच्या बळाने जि.प.सीईओची गेली विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डांगे यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले. दवनीवाडा येथील शाळा बांधकामाचे चौकशी प्रकरण असो वा शिक्षकांच्या निलंबनाचा विषय त्यांनी नेहमीच एकांगी भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांना भोवली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे विरुद्ध आणि आमदार असा गुप्त संघर्ष सुरू होता. या संघर्षात शिक्षक आणि ग्रामसेवकांच्या आंदाेलनाची भर पडली. डांगे यांनी आमदारांवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वरचढपणा करणे त्यांना भाेवला. त्यामुळे जिल्ह्यातील चारही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना गाठून डांगे यांची थेट तक्रार केली.  यानंतर गुरुवारी (दि.२७) डांगे यांच्या बदलीचे आदेश धडकले. त्यामुळे आमदारांचे एकीचे बळ अन् सीईओंची विकेट गेल्याचा अनुभव जिल्हावासीयांना आला. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डांगे यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले. दवनीवाडा येथील शाळा बांधकामाचे चौकशी प्रकरण असो वा शिक्षकांच्या निलंबनाचा विषय त्यांनी नेहमीच एकांगी भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांना भोवली. त्यातच ग्रामसेवकांचे निलंबन प्रकरणसुद्धा चांगलेच भोवले. जि. प.मुख्य कार्यकाऱ्यांविरुद्ध ग्रामसेवकांनी प्रथमच एवढी उघड भूमिका घेतली. याचा संदेशसुद्धा मुंबईपर्यंत गेला. शिवाय त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून काही वादग्रस्त प्रकरणे भोवली. केवळ विरोधी नव्हे, तर सत्ता पक्षाच्या आमदारांनीसुद्धा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसमोर डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. तेव्हापासूनच त्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले होते. त्यांच्या बंगल्यावरील बागेत एका अधिकाऱ्याने टाकलेल्या सेंद्रिय खताच्या प्रकरणाची चर्चासुद्धा चांगली होती. ही सर्वच प्रकरणे डांगे यांच्या बदलीस कारणीभूत ठरली. असो, पण शेवटी या निमित्ताने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांचे एकीचे बळ फळाला आले म्हटल्यास वावगे होणार नाही. हीच भूमिका यापुढे कायम ठेवल्यास निश्चितच जिल्ह्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल हे कुणीही नाकारू शकत नाही. 

त्या प्रकरणाची चौकशी कराच केवळ विरोधी पक्षाचे नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीसुद्धा काही प्रकरणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता त्यांची बदली झाली म्हणून या प्रकरणावर पडदा न टाकता या प्रकरणाची सखोल चौकशी करून एकदा ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाऊ द्या.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद