शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जि.प. शाळेतील उणिवा कोण व कधी सोडविणार?

By admin | Updated: October 27, 2014 22:39 IST

केंद्र सरकारने बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम ९ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी व त्यासंबंधीची माहिती लोक प्रतिनिधींना व्हावी यासाठी जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले.

नामदेव हटवार - सालेकसाकेंद्र सरकारने बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम ९ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी व त्यासंबंधीची माहिती लोक प्रतिनिधींना व्हावी यासाठी जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले. जिल्हा परिषदेच्या शाळा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मागे पडू नये, तसेच समाजाचा कल जिल्हा परिषद शाळांकडे वळावा या दृष्टिकोनातून गावची शाळा आमची शाळा हा अभिनव उपक्रम शिक्षण विभागाने राबविणे सुरू केले. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून याचे चांगले वाईट परिणाम पुढील काळात दिसून येतील. या प्रकल्पात निर्वाचित सर्वच जनप्रतिनिधींना प्रत्यक्ष शाळेसोबत जुळण्याची संधी निर्माण झाली आहे. त्याव्दारे शाळेतील उत्कृष्ट उपक्रम व समस्या यांची माहिती या निमित्ताने जनप्रतिनिधींना व्हावयास सुरुवात झाली. मात्र शाळेतील अनेक समस्या यानिमित्ताने ऐरणीवरुन येऊन ते दूर होणे अपेक्षित असून ते दूर कोण व कधी करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सालेकसा तालुक्यातील १२० शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. या सर्व शाळांत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या शाळांत काही मूलभूत समस्या आहेत. जर गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाव्दारे जर या समस्या सुटल्या तर निश्चितच या प्रकल्पाचे यश मानावे लागेल. जिल्हा परिषदेच्या शाळांना मीटर व विद्युत पुरवठा देण्यात आला. परंतु ८०-८५ टक्के शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. मीटर असून विद्युत बिलांच्या जास्तीच्या प्रकारामुळे शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. बिल भरण्यासाठी जास्त निधी शाळांना देण्यात येत नाही. मग उजेडात शिक्षण कसे घेणार? संगणक शाळांना पुरविण्यात आलेले आहे. खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे हे संगणक कसे सुरू होणार? आदीवासी विद्यार्थी संगणक कसे शिकणार? ही समस्या निर्माण झालेली आहे. काही ठिकाणचे संगणक बिघडलेले आहेत. ते दुरूस्त करण्यासाठी निधीची गरज असतांना निधी मिळत नाही. त्यामुळे ते धूळखात पडले आहे. यालाच उत्कृष्ट शिक्षण म्हणायचे काय? विद्युत विभागाने शाळा म्हणजे उत्पन्नाचे साधन मानले म्हणून त्यांना व्यावसायीक मीटरचे बिल दिल्या जाते. जिल्हा परिषद शाळेतून कोणते उत्पन्न मिळते हा गंभीर संशोधनाचा विषय आहे. याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे. एका बाजूला आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्राचा विकास करायची घोषणा करायची व दुसऱ्या बाजूला समस्या निर्माण करून जैसे थे ठेवायचे अशी भूमिका आहे. अनेक शाळांना स्वच्छतागृह नाहीत, काही ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे. काही ठिकाणी सुरक्षा भिंत नाही, खेळण्याचे साहित्य नाही, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर दिले पण ते नादुरूस्त आहेत. दुरूस्त करण्यासाठी निधी नाही, काही ठिकाणी पिण्याचे पाणी लांब अंतरावरून आणावे लागते. मोठ्या शाळेत चपराशी नाही, शाळा कोणी झाडूने स्वच्छ करायची, आवारभिंत कोणी साफ करायची, शिक्षकांना पिण्याचे पाणी कोण देणार, त्यांचे टेबल स्वच्छ कोण करणार, मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांचाा घरभाडे भत्ता कोण थांबविणार, वेळेवर शाळेत न जाणाऱ्या शिक्षकांवर कोण कारवाई करणार अशा विविध समस्या जिल्हा परिषद शाळांशी निगडीत आहेत. तेव्हा या समस्या कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण होतो. जर या समस्या सुटत असतील तर गावची शाळा, आमची शाळा हा प्रकल्प यशस्वी झाला असे म्हणणे सार्थ ठरले. जर या प्रकल्पाव्दारे या समस्या सुटत नसतील तर फक्त कागदी घोड्यावरच हा प्रकल्प यशस्वी होईल असे म्हणावे लागेल. या प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्या सोबतच शाळांच्या समस्याही सोडविणे अत्यंत आवश्यक आहे. याची जाणीव प्रत्येक नगारिकाने, पालकाने, जनप्रतिनिधीने, शिक्षक, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे. जर ही जाणीव ठेवली जात नसेल तर मात्र योजना किती ही चांगली असो राबविणारे जर कामचुकारपणा करणारे असतील तर तिचा बट्याबोळ होण्यास वेळ लागत नाही. तरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सर्वांनी केले पाहिजे.