शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वर्गखोल्यांमध्ये शाळा भरवायची कशी तुम्हीच सांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी जानेवारी २०२० ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. जीर्ण झालेल्या शाळेच्या खोल्या पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

चरण चेटुलेलोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील ४ किमी अंतरावर असलेल्या ग्राम करांडली येेथे जिल्हा परिषदेची १ ते ४ पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे बांधकाम विटामाती व कवेलूचे असल्यामुळे जुनी झाल्याने भिंतीना भेगा पडून पावसाळ्याच्या दिवसात खोल्यांमध्ये पाणी गळून चार वर्गाची बैठक व्यवस्था दोन खोल्यांमध्ये करुन शैक्षणिक कार्य करण्यात येतात. त्यामुळे जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमध्ये बसवून शिकवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी जानेवारी २०२० ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. जीर्ण झालेल्या शाळेच्या खोल्या पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन नवीन शाळेच्या खोल्या बांधण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश शहारे यांनी केली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारती सुंदर बोलक्या आणि डिजिटल करण्याच्या नादात शासन जुन्या इमारत खोल्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करुन नवीन बांधकाम करण्याचा विसर पडल्याचे ग्राम करांडली येथील प्राथमिक शाळेच्या खोल्यांकडे पाहिल्यानंतर येत आहे. 

शाळा भरविण्याची समस्या - अलीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने १७ ऑगस्ट २०२१ पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनी मोरगाव तालु्क्यातील करांडली येथील १ ते ४ पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून शालेय इमारत जुनी झाल्यामुळे जीर्ण होऊन खोल्यांच्या भितींना भेगा पडून पावसाळ्याच्या दिवसात कवेलूमधून पाणी गळत असते. शाळा सुरु झाल्यास या शाळेत मुलांना शाळा पडण्याच्या भीतीमुळे पालक शाळेत पाठवतात किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावकऱ्यांच्या पत्राची दखल नाही -  गेल्यावर्षी ४ वर्गाची विद्यार्थी संख्या दोन खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था करुन विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना अध्यापन कार्य पार पाडावे लागत असे. विद्यार्थ्यांचे भविष्य व हित लक्षात घेऊन नवीन खोल्यांच्या बांधकामाची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे नागरिकांनी अनेकदा मागणी केली आहे, परंतु प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे नवीन खोल्या बांधकामाची दखल घेतली नाही. कदाचित जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असती तर कोरोनामुळे बंद असलेल्या कालावधीत शाळेच्या खोल्यांचे बांधकाम करता आले असते, परंतु प्रशासनाची शिक्षण क्षेत्रावर असलेली अनास्था कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

 

टॅग्स :Schoolशाळा