शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

आमगावला येत आहात.. मग जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2022 5:00 AM

आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व   रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने   या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या रस्त्याने जाणे-येणे म्हणजे तारेवरची जणू कसरतच म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यातच प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

नरेंद्र कावळेलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ‘नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया’द्वारा आमगाव ते गोंदिया रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. आमगाव ते गोंदिया दरम्यान किमान २५ किलोमीटर रस्ता म्हणजे ‘मरायला सस्ता’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने ‘गोंदियावरून आमगावला येत आहे का मग जरा जपून’ असे वाक्य प्रत्येक माणसांच्या तोंडातून निघत आहेत .  आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व   रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने   या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या रस्त्याने जाणे-येणे म्हणजे तारेवरची जणू कसरतच म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यातच प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.  पुण्यातील एका कंपनीमार्फत या रस्त्याचे काम सुरू असून संपूर्ण रस्ता उखडला आहे. एक बाजूला खोदकाम करून दुसरी बाजूसुद्धा ठेकेदाराने जाण्या-येण्यासाठी व्यवस्थित ठेवली नाही.....या रस्त्याच्या दुर्दशेमुळे राज्य परिवहन महामंडळाने या रस्त्यावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्यादेखील कमी करून टाकल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहने अपघातग्रस्त झालेली दिसून येतात. त्यातच दुचाकीचालकांना मोठ्या अपघातास निमंत्रण दिले जात आहेत. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष दिसत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याची तपासणी करतानासुद्धा दिसून येत नाही.  रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने धुळीचे प्रमाणही वाढले आहे. धूळ उडू नये याकरिता  रस्त्यावर पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळेही वाहन स्लिप होऊन अपघात होत आहे. कंपनीमार्फत कुठेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. कंपनीने नियोजनबद्ध  पद्धतीने रस्त्याचे लवकरात बांधकाम करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

गोरेगाव मार्गाने ये-जा- आमगाव-गोंदिया मार्गाची दुर्दशा व त्यामुळे होणारा त्रास बघता देवरीवरून गोंदियाकडे येणारे तसेच गोंदियाहून देवरीकडे जाणारे आमगाव मार्ग सोडून गोरेगाव मार्गाने जाणे पसंत करीत आहेत. यामध्ये त्यांना फेरा मारावा लागत असून तेवढाच इंधनखर्च वाढत आहे. मात्र त्रास करून घेण्यापेक्षा फेरा मारणे जास्त सोयीचे ठरत आहे.

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग