शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यंदा खरीपचे १ लाख ९१ हजार हेक्टरवर नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:00 IST

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.

ठळक मुद्दे६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी : बळीराजा लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.मृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरूवात करतो. मात्र मागील दोन तीन वर्षांचा अनुभव पाहता मृगाचा पाऊस बरसतच नसल्याने पेरण्या लांबणीवर जात असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी पावासाने पाठ फिरविल्याने उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. सततची नापिकी व दुष्काळामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना बळीराजा पुन्हा मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.मृगाचा पाऊस बरसण्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूूर्ण व्हावी. यासाठी शेतकरी संपूर्ण कुटुंबासह पहाटेपासूनच शेतात राबताना दिसून येत आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये नांगरणी आणि वखरणी पूर्ण करुन व शेणखत टाकून शेतीच्या मशागतीची कामे करीत पूर्ण आहे. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराचे बळीराजाला टेशंन असले तरी तो पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने सुध्दा खरीप हंगामात एकूण क्षेत्रावर होणारी विविध पिकांची लागवड लक्षात घेवून त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर लागवड योग्य क्षेत्र असून त्यापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे.यामध्ये सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून त्यापाठोपाठ, तूर, उडीद, मूंग या पिकांची लागवड केली जाणार आहे. खरीपासाठी ५५ हजार क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने महाबीजकडे केली आहे. तर खरीपा दरम्यान खताची मागणी लक्षात घेवून ६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी