शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

यंदा खरीपचे १ लाख ९१ हजार हेक्टरवर नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:00 IST

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.

ठळक मुद्दे६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी : बळीराजा लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.मृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरूवात करतो. मात्र मागील दोन तीन वर्षांचा अनुभव पाहता मृगाचा पाऊस बरसतच नसल्याने पेरण्या लांबणीवर जात असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी पावासाने पाठ फिरविल्याने उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. सततची नापिकी व दुष्काळामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना बळीराजा पुन्हा मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.मृगाचा पाऊस बरसण्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूूर्ण व्हावी. यासाठी शेतकरी संपूर्ण कुटुंबासह पहाटेपासूनच शेतात राबताना दिसून येत आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये नांगरणी आणि वखरणी पूर्ण करुन व शेणखत टाकून शेतीच्या मशागतीची कामे करीत पूर्ण आहे. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराचे बळीराजाला टेशंन असले तरी तो पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने सुध्दा खरीप हंगामात एकूण क्षेत्रावर होणारी विविध पिकांची लागवड लक्षात घेवून त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर लागवड योग्य क्षेत्र असून त्यापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे.यामध्ये सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून त्यापाठोपाठ, तूर, उडीद, मूंग या पिकांची लागवड केली जाणार आहे. खरीपासाठी ५५ हजार क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने महाबीजकडे केली आहे. तर खरीपा दरम्यान खताची मागणी लक्षात घेवून ६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी