शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

यंदा खरीपचे १ लाख ९१ हजार हेक्टरवर नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:00 IST

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.

ठळक मुद्दे६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी : बळीराजा लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे.मृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरूवात करतो. मात्र मागील दोन तीन वर्षांचा अनुभव पाहता मृगाचा पाऊस बरसतच नसल्याने पेरण्या लांबणीवर जात असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी पावासाने पाठ फिरविल्याने उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. सततची नापिकी व दुष्काळामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना बळीराजा पुन्हा मोठ्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.मृगाचा पाऊस बरसण्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूूर्ण व्हावी. यासाठी शेतकरी संपूर्ण कुटुंबासह पहाटेपासूनच शेतात राबताना दिसून येत आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये नांगरणी आणि वखरणी पूर्ण करुन व शेणखत टाकून शेतीच्या मशागतीची कामे करीत पूर्ण आहे. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराचे बळीराजाला टेशंन असले तरी तो पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने सुध्दा खरीप हंगामात एकूण क्षेत्रावर होणारी विविध पिकांची लागवड लक्षात घेवून त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर लागवड योग्य क्षेत्र असून त्यापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे.यामध्ये सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून त्यापाठोपाठ, तूर, उडीद, मूंग या पिकांची लागवड केली जाणार आहे. खरीपासाठी ५५ हजार क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने महाबीजकडे केली आहे. तर खरीपा दरम्यान खताची मागणी लक्षात घेवून ६४ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी