शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्यात चार लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज

By admin | Updated: December 1, 2014 22:55 IST

पावसाच्या लहरीपणामुळे यंदाचा खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरला. पावसाच्या खेळीमुळे यंदा खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी समाधानाचा नसला तरीही मागील वर्षाच्या तुलनेत अधिकचे

कृषी विभाग : पीक कापणी प्रयोगाचा आधारकपिल केकत - गोंदियापावसाच्या लहरीपणामुळे यंदाचा खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरला. पावसाच्या खेळीमुळे यंदा खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी समाधानाचा नसला तरीही मागील वर्षाच्या तुलनेत अधिकचे उत्पादन देणारा राहणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कृषी विभागाने केलेल्या ३०० पैकी २१९ प्रयोगांत तीन लाख ३५ हजार मॅट्रीक टन उत्पादनाची शक्यता दिसून आली आहे. उर्वरीत ८१ प्रयोगांत उत्पादनाचे प्रमाण वाढणार असून सुमारे चार लाख मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची राज्यातच नाही तर देशपातळीवर ओळख आहे. येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक धान असून त्यामुळे जिल्ह्यात धानाची भरभराट असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे ‘कभी खुशी-कभी गम’ च्या परिस्थितीचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागतो. यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना काही प्रमाणात डोकेदुखीचा सामना करावा लागला. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली व त्याचा परिणाम उत्पादनावरही जाणवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.यंदा जिल्ह्यात एक लाख ८८ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धान उत्पादनाच्या या घडामोडीवर लक्ष ठेवत कृषी विभाग येणाऱ्या उत्पादनाचा आढावा घेत राहते. विशेष म्हणजे कृषी विभागाचा संपूर्ण कारभार धानाऐवजी तांदळावर चालत असल्याने ते जिल्ह्यातील तांदळाच्या उत्पादनावर लक्ष लाऊन राहतात. यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कृषी विभाग, महसूल विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करतात. या प्रयोगांत २७.३० क्विंटल दर हेक्टरी धानाचे तर १८.८४ क्विंटल दर हेक्टरी तांदळाचे उत्पादन होऊ शकते असा अंदाज दिसून आला आहे. या आधारे जिल्ह्याचे उत्पादन बघितल्यास तीन लाख ३५ हजार ३६० मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज बांधला जात आहे. ८१ प्रयोग अद्याप झालेले नसल्याने त्यांचा अंदाज धरल्यास यंदा जिल्ह्यात सुमारे चार लाख मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्याचे शेतकरी बोलत आहेत. तर कृषी विभागाने चार लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे आता खरे चित्र काय असणार ते प्रत्यक्षात उत्पादन हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे.