शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

यंदा रब्बीचे क्षेत्र २५ हजार हेक्टरने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:07 IST

यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीपासह रब्बी हंगाम सुध्दा अडचणीत आला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता कमी असून रब्बीच्या लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टरने घट होणार आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात मोजकाच पाणीसाठा : तुरीचे उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीपासह रब्बी हंगाम सुध्दा अडचणीत आला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता कमी असून रब्बीच्या लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टरने घट होणार आहे.जिल्ह्यात खरीपात दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तर ५० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. सिंचन प्रकल्पातील पाणी साठा आणि परतीचा पाऊस यावर रब्बी हंगामाचे बरेच गणित अवलंबून असते. जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस होतो. मात्र यंदा सप्टेबरपर्यंत केवळ ९३० मि.मी.पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने आणि सप्टेबरनंतर पाऊस बेपत्ता झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा होता. एका पावसाअभावी धानपिके संकटात आल्याने पुजारीटोला, इटियाडोहसह इतर प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ३० ते ४० टक्के पाणी शिल्लक आहे. यापैकी २५ टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाते. त्यानंतर शिल्लक राहणारे पाणी रब्बी पिकासाठी सोडले जाते. मागील वर्षीसुध्दा अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तीच स्थिती यंदा देखील असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड करणे टाळले आहे. त्यामुळेच कृषी विभागाने सुध्दा यंदा केवळ २५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या कालावधीत यंदा प्रथमच रब्बीच्या लागवड क्षेत्रात २५ हजार हेक्टरने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.कठाण उत्पादन घटणारयंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. तर खरीपानंतर रब्बीत चना, तूर, मूंग तसेच कठाण पिकांची लागवड केली जाते. मात्र पाऊस आणि थंडी अभावी यंदा कठाण मालाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ही स्थिती संपूर्ण विदर्भात राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प