शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागामार्फत सेंद्रीय शेती विषयावर कार्यशाळा

By admin | Updated: June 12, 2016 01:35 IST

जिल्ह्यातील ‘एमएसीपी’ प्रकल्प अंतर्गत स्थापन झालेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीतील ५० सभासद शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीकरिता

गोंदिया : जिल्ह्यातील ‘एमएसीपी’ प्रकल्प अंतर्गत स्थापन झालेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीतील ५० सभासद शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीकरिता समूहाची निवड करण्यात आली आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती व प्रचार-प्रसाराकरिता जैन कुशल भवन पुराना बस स्टँड रोड, गोंदिया येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान परंपरागत कृषी विकास योजना २०१५-२०१६ सेंद्रीय शेती या योजनेंतर्गत जिल्हा कृषी अधीक्षक गोंदिया, प्रकल्प संचालक कृषी अधीक्षक गोंदिया तसेच प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून सेंद्रीय शेती तज्ज्ञ हेमंत चव्हाण नागपूर, कृषि अधीक्षक तथा प्रकल्प संचालक आत्मा गोंदियाचे चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया नाईनवाड, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा गोरेगावचे पटले, सेंद्रीय भाजीपाला चिराग पाटील, भात शेती उत्पादक समूहाचे अध्यक्ष प्यारेलाल गौतम, सचिव टोपराम फुकटकर, सुरेंद्र मेंढे (एनयूएस) शेतकरी उत्पादक कंपनीचे कोषाध्यक्ष उपस्थित होते. कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक हेमंत चव्हाण यांनी सेंद्रीय शेती ही आजच्या काळाची गरज आहे. सेंद्रीय शेती करुन जमिनीचे आरोग्य टिकवून सर्वांनी विषमुक्त शेतमाल उत्पादन करायला पाहिजे, सेंद्रीय शेतमालाचे फायदे, सेंद्रीय शेतमालाला मोठा आंतरराष्ट्रीय बाजार उपलब्ध असल्याचे सांगितले. चव्हाण साहेब प्रकल्प संचालक आत्मा यांनी परंपरागत कृषी विकास योजना ही राष्ट्रीय शाश्वत अभियान अंतर्गत आहे. या योजनेमध्ये ४० टक्के राज्य शासनाचा व ६० टक्के केंद्र शासनाचा अनुदान असून शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानीत आहे. ही योजना ३ वर्ष कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.उपविभागीय कृषी अधिकारी नाईकवाड यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे व या योजनेंतर्गत जे शेतकरी सेंद्रीय शेती करतील त्यांना ३ वर्षानंतर सेंद्रीय शेती शेतमाल उत्पादक म्हणून प्रमाणित करण्यात येईल, अशी माहिती दिली.गटसमन्वयक योगेंद्र बिसेन, चिराग पाटील संस्था तिल्ली (मोहगाव) यांनी आपण देशी गाईपासून घरगुती खत, जिवामृत, बिजामृत, घनामृत, दशपर्णी तयार करण्याची पद्धत व घरगुती खतांचा वापर करुन रासायनिक खत किटकनाशकाचा वापर टाळून चांगले उत्पादन घेऊ शकतो. या प्रकारचा उपक्रम आम्ही संस्थेमार्फत मागील ३ वर्षांपासून राबवित आहोत. ज्या शेतकऱ्यांनी या घरगुती खताचा वापर केला त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कृषी पणन तज्ज्ञ आत्मा गोंदिया टेंभूर्णेकर व आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गोरेगाव पटले यांनी केले. (वार्ताहर)