शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:11 IST

पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरातील विकास कार्य ........

ठळक मुद्देप्रफुुल्ल पटेल : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरातील विकास कार्य एकजुटीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी व तालुका युवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि.२३) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, नामदेव डोंगरवार, लोकपाल गहाणे, राकेश लंजे, यशवंत परशुरामकर, जनार्धन काळसर्पे, रतिराम राणे, यशवंत गणवीर, सुधीर साधवानी, नितीन धोटे, योगेश नाकाडे, सुशिला हलमारे उपस्थित होते.पुढे बोलताना पटेल यांनी, तालुक्यातील प्रत्येक गावागावात जावून बुथनिहाय मतदानाची आकडेवारी निश्चित करावी. तरुण मंडळींशी सुसंवाद साधून आत्मविश्वास निर्माण करुन त्यांची अडलेली कामे पूर्ण करावी. गावातील प्रत्येक माणूस राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडणे गरजेचे आहे. सामान्य लोकांची कामे विश्वासाने केली तर निश्चित बुथनिहाय आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. यासाठी बुथ कार्यकर्त्यानी सजग राहून कार्य करावे असे सांगीतले.नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये लोकांना नुसते आश्वासन देवून भुरळ पाडली. आता ती परिस्थिती राहीली नाही. पंतप्रधान मोदीचे पितळ उघडे पडले आहे. महाराष्ट्रात ७२ हजार मेगा नोकरी भरती करण्याचे खोटे सांगीतले. चार लाख नोकऱ्यांची गरज असतांना सरकारी नोकºयांमध्ये बंदी घातली आहे. काळा पैसा परत आणून १५-१५ हजार प्रत्येक शेतकºयांच्या खात्यात जमा करणे, नक्षलग्रस्त या परिसरातील विकास निधीचे २५ हजार कोटी नाहीसे करणे, आजपर्यंत कोणत्याही शेतकºयांना पीक विम्याचा फायदा मिळाला नाही. यात भाजप सरकारने फार मोठा घोटाळा केला आहे. शेतकºयांचे २० हजार कोटी विमा कंपनीकडे प्रिमियम पोटी जमा होत असतांना शेतकºयांना नुकसान भरपाई म्हणून दोन हजार कोटी रुपये मंजूर करुन शेतकºयांचा तोंडाला पाने पुसीत असल्याचा आरोप करुन विमान खरेदीत ६०० कोटी ऐवजी १६०० कोटी देवून भ्रष्टाचार केल्याचेही ते म्हणाले.याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी बुथनिहाय आढावा घेवून माहिती दिली. प्रास्ताविकातून अनिल लाडे यांनी खा. प्रफुल पटेल यांनी यापूर्वी केलेल्या विकास कामाची माहिती देऊन पुढील प्रस्तावित विकास कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मेळाव्याला परिसरातील एक हजार महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार तरोणे यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसprafull patelप्रफुल्ल पटेल