शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:11 IST

पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरातील विकास कार्य ........

ठळक मुद्देप्रफुुल्ल पटेल : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरातील विकास कार्य एकजुटीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी व तालुका युवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि.२३) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, नामदेव डोंगरवार, लोकपाल गहाणे, राकेश लंजे, यशवंत परशुरामकर, जनार्धन काळसर्पे, रतिराम राणे, यशवंत गणवीर, सुधीर साधवानी, नितीन धोटे, योगेश नाकाडे, सुशिला हलमारे उपस्थित होते.पुढे बोलताना पटेल यांनी, तालुक्यातील प्रत्येक गावागावात जावून बुथनिहाय मतदानाची आकडेवारी निश्चित करावी. तरुण मंडळींशी सुसंवाद साधून आत्मविश्वास निर्माण करुन त्यांची अडलेली कामे पूर्ण करावी. गावातील प्रत्येक माणूस राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडणे गरजेचे आहे. सामान्य लोकांची कामे विश्वासाने केली तर निश्चित बुथनिहाय आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. यासाठी बुथ कार्यकर्त्यानी सजग राहून कार्य करावे असे सांगीतले.नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये लोकांना नुसते आश्वासन देवून भुरळ पाडली. आता ती परिस्थिती राहीली नाही. पंतप्रधान मोदीचे पितळ उघडे पडले आहे. महाराष्ट्रात ७२ हजार मेगा नोकरी भरती करण्याचे खोटे सांगीतले. चार लाख नोकऱ्यांची गरज असतांना सरकारी नोकºयांमध्ये बंदी घातली आहे. काळा पैसा परत आणून १५-१५ हजार प्रत्येक शेतकºयांच्या खात्यात जमा करणे, नक्षलग्रस्त या परिसरातील विकास निधीचे २५ हजार कोटी नाहीसे करणे, आजपर्यंत कोणत्याही शेतकºयांना पीक विम्याचा फायदा मिळाला नाही. यात भाजप सरकारने फार मोठा घोटाळा केला आहे. शेतकºयांचे २० हजार कोटी विमा कंपनीकडे प्रिमियम पोटी जमा होत असतांना शेतकºयांना नुकसान भरपाई म्हणून दोन हजार कोटी रुपये मंजूर करुन शेतकºयांचा तोंडाला पाने पुसीत असल्याचा आरोप करुन विमान खरेदीत ६०० कोटी ऐवजी १६०० कोटी देवून भ्रष्टाचार केल्याचेही ते म्हणाले.याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी बुथनिहाय आढावा घेवून माहिती दिली. प्रास्ताविकातून अनिल लाडे यांनी खा. प्रफुल पटेल यांनी यापूर्वी केलेल्या विकास कामाची माहिती देऊन पुढील प्रस्तावित विकास कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मेळाव्याला परिसरातील एक हजार महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन उद्धव मेहेंदळे यांनी केले. आभार तरोणे यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसprafull patelप्रफुल्ल पटेल