शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

६०० कि.मी.चा प्रवास करुन मजुरांनी गाठले नवेगावबांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली जेवनाची सोय : रोजगारासाठी गेले होते हैदराबादला

रामदास बोरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि बालाघाट कटंगी येथून काही मजूर रोजगारासाठी हैद्राबाद येथे गेले होते. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने त्यांना आपल्या गावाकडे परत जाण्याची वेळ आली. तब्बल सहा दिवस ६२४ कि.मी.चा प्रवास करुन ३१ मार्चला रात्री १२ वाजता हे मजूर देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचले. दरम्यान ही बाब काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकºयांनी या सर्वांची जेवनाची सोय रात्रीच केली.त्यामुळे अन्नपाण्याविना प्रवास करणाºया मजुरांना नवेगावबांध देवलगाव येथे माणुसकीचे दर्शन घडले.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर काही व्यक्ती असल्याची माहिती गावकºयांना मिळाली. गोंदिया जिल्हा शिवसेना उपप्रमुख शैलेश जयस्वाल, अनिल जैन, प्रकाश तरोणे, पोलीस नायक बापू येरणे, साबीर शेख, तलाठी पुंडलिक कुंभरे हे रेल्वेस्थानकावर पोहोचले. या मजुरांना विचारणा केली असता मजुरांनी हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलो होतो असे सांगितले.लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.तब्बल सहा दिवस ६२५ कि.मीे.चा प्रवास केल्यानंतर ते मंगळवारी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वे स्थानकावर पोहचले. चार दिवस त्यांच्याकडे थोडेसे खाण्यापिण्याचे साहित्य होते. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांचा प्रवास केवळ पाण्यावरच सुरू होता असे मजुरांनी गावकºयांना सांगितले. काही झाले कितीही त्रास झाला तरी आपण आपले गाव गाठायचे असा निर्धार आम्ही सर्वांनी केल्याचे सांगत आपली व्यथा गावकºयांना सांगितली. त्यांची व्यथा ऐकून गावकºयांचे सुध्दा डोळे पाणावले. माधव चचाणे यांनी पुढाकार घेऊन या सर्व मजुरांची जेवनाची सोय रात्रीच केली. त्यानंतर या सर्व मजुरांनी येथील रेल्वे स्थानकावर विश्रांती केली.दिवस उजाडताच या मजुरांनी आपल्या गावाकडच्या प्रवासाला सुरूवात केली.रात्रीचे बारा वाजले असताना सुध्दा गावकºयांनी या मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केल्याने नवेगावबांधकरांच्या प्रेमाने हे मजूर सुध्दा भारावून गेले होते.त्यांनी गावकºयांचे आभार मानत ६२५ कि.मि.च्या प्रवासात ठिकठिकाणी माणुसकीचे दर्शन घडल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार