शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

६०० कि.मी.चा प्रवास करुन मजुरांनी गाठले नवेगावबांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली जेवनाची सोय : रोजगारासाठी गेले होते हैदराबादला

रामदास बोरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि बालाघाट कटंगी येथून काही मजूर रोजगारासाठी हैद्राबाद येथे गेले होते. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने त्यांना आपल्या गावाकडे परत जाण्याची वेळ आली. तब्बल सहा दिवस ६२४ कि.मी.चा प्रवास करुन ३१ मार्चला रात्री १२ वाजता हे मजूर देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचले. दरम्यान ही बाब काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकºयांनी या सर्वांची जेवनाची सोय रात्रीच केली.त्यामुळे अन्नपाण्याविना प्रवास करणाºया मजुरांना नवेगावबांध देवलगाव येथे माणुसकीचे दर्शन घडले.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर काही व्यक्ती असल्याची माहिती गावकºयांना मिळाली. गोंदिया जिल्हा शिवसेना उपप्रमुख शैलेश जयस्वाल, अनिल जैन, प्रकाश तरोणे, पोलीस नायक बापू येरणे, साबीर शेख, तलाठी पुंडलिक कुंभरे हे रेल्वेस्थानकावर पोहोचले. या मजुरांना विचारणा केली असता मजुरांनी हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलो होतो असे सांगितले.लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.तब्बल सहा दिवस ६२५ कि.मीे.चा प्रवास केल्यानंतर ते मंगळवारी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वे स्थानकावर पोहचले. चार दिवस त्यांच्याकडे थोडेसे खाण्यापिण्याचे साहित्य होते. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांचा प्रवास केवळ पाण्यावरच सुरू होता असे मजुरांनी गावकºयांना सांगितले. काही झाले कितीही त्रास झाला तरी आपण आपले गाव गाठायचे असा निर्धार आम्ही सर्वांनी केल्याचे सांगत आपली व्यथा गावकºयांना सांगितली. त्यांची व्यथा ऐकून गावकºयांचे सुध्दा डोळे पाणावले. माधव चचाणे यांनी पुढाकार घेऊन या सर्व मजुरांची जेवनाची सोय रात्रीच केली. त्यानंतर या सर्व मजुरांनी येथील रेल्वे स्थानकावर विश्रांती केली.दिवस उजाडताच या मजुरांनी आपल्या गावाकडच्या प्रवासाला सुरूवात केली.रात्रीचे बारा वाजले असताना सुध्दा गावकºयांनी या मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केल्याने नवेगावबांधकरांच्या प्रेमाने हे मजूर सुध्दा भारावून गेले होते.त्यांनी गावकºयांचे आभार मानत ६२५ कि.मि.च्या प्रवासात ठिकठिकाणी माणुसकीचे दर्शन घडल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार