शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

६०० कि.मी.चा प्रवास करुन मजुरांनी गाठले नवेगावबांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली जेवनाची सोय : रोजगारासाठी गेले होते हैदराबादला

रामदास बोरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि बालाघाट कटंगी येथून काही मजूर रोजगारासाठी हैद्राबाद येथे गेले होते. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने त्यांना आपल्या गावाकडे परत जाण्याची वेळ आली. तब्बल सहा दिवस ६२४ कि.मी.चा प्रवास करुन ३१ मार्चला रात्री १२ वाजता हे मजूर देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचले. दरम्यान ही बाब काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकºयांनी या सर्वांची जेवनाची सोय रात्रीच केली.त्यामुळे अन्नपाण्याविना प्रवास करणाºया मजुरांना नवेगावबांध देवलगाव येथे माणुसकीचे दर्शन घडले.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर काही व्यक्ती असल्याची माहिती गावकºयांना मिळाली. गोंदिया जिल्हा शिवसेना उपप्रमुख शैलेश जयस्वाल, अनिल जैन, प्रकाश तरोणे, पोलीस नायक बापू येरणे, साबीर शेख, तलाठी पुंडलिक कुंभरे हे रेल्वेस्थानकावर पोहोचले. या मजुरांना विचारणा केली असता मजुरांनी हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलो होतो असे सांगितले.लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.तब्बल सहा दिवस ६२५ कि.मीे.चा प्रवास केल्यानंतर ते मंगळवारी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वे स्थानकावर पोहचले. चार दिवस त्यांच्याकडे थोडेसे खाण्यापिण्याचे साहित्य होते. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांचा प्रवास केवळ पाण्यावरच सुरू होता असे मजुरांनी गावकºयांना सांगितले. काही झाले कितीही त्रास झाला तरी आपण आपले गाव गाठायचे असा निर्धार आम्ही सर्वांनी केल्याचे सांगत आपली व्यथा गावकºयांना सांगितली. त्यांची व्यथा ऐकून गावकºयांचे सुध्दा डोळे पाणावले. माधव चचाणे यांनी पुढाकार घेऊन या सर्व मजुरांची जेवनाची सोय रात्रीच केली. त्यानंतर या सर्व मजुरांनी येथील रेल्वे स्थानकावर विश्रांती केली.दिवस उजाडताच या मजुरांनी आपल्या गावाकडच्या प्रवासाला सुरूवात केली.रात्रीचे बारा वाजले असताना सुध्दा गावकºयांनी या मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केल्याने नवेगावबांधकरांच्या प्रेमाने हे मजूर सुध्दा भारावून गेले होते.त्यांनी गावकºयांचे आभार मानत ६२५ कि.मि.च्या प्रवासात ठिकठिकाणी माणुसकीचे दर्शन घडल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार