शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; लखनौ व पंजाबमध्ये अडकले गोंदियातील तिरोड्याचे मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 14:31 IST

जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नेपाळ आणि पंजाब येथे गेलेले ८ मजूर मागील चार दिवसांपासून लखनौ आणि पंजाबमध्ये अडकले आहेत. त्यांना अन्न पाणी सुध्दा मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारकडे मदतीसाठी साकडेचार दिवसांपासून संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नेपाळ आणि पंजाब येथे गेलेले ८ मजूर मागील चार दिवसांपासून लखनौ आणि पंजाबमध्ये अडकले आहेत. त्यांना अन्न पाणी सुध्दा मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. गावाकडे परत येण्यासाठी कुठल्याही साधनाची सोय नाही. तेथील स्थानिक नागरिक देखील त्यांना सहकार्य करीत नसल्याने त्यांची अडचण निर्माण झाली आहे. महाराष्टÑ सरकारने आम्हाला परत येण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी याचना त्यांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. रेल्वेसह सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे.तर जिल्हा आणि राज्याच्या सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहे. त्यामुळे बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर अनेक रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर अडकले आहेत. प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील नेतलाल कोसरे, शांतीलाल कोसरे, जितेंद्र कोसरे,निखील कोसरे, संदीप कोसरे हे नेपाळ येथे मजुरीसाठी गेले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नेपाळ सरकारने सुध्दा तेथील बाहेरील मजुरांना आपल्या गावाकडे परत जाण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे हे सर्व पाचही जण नेपाळवरुन निघाले. मात्र याच दरम्यान देशात लॉक डाऊन करण्यात आल्याने ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथे अडकले आहेत. आता त्यांना रेल्वे स्थानकावरुन सुध्दा जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अशीच परिस्थिती पंजाब येथे काम करण्यासाठी गेलेल्या दिलीप तेजराम मेश्राम, रजनीकांत रहांगडाले,चक्रधर कोसरकर यांची झाली आहे. ते सुध्दा गावाकडे परत येत असताना पंजाबमधील संडारसी, तालुका राजापुरा येथे अडकले आहे. ते एका केमिकल कंपनीत काम करण्यासाठी गेले होते. मागील तीन दिवसांपासून त्यांनी संडारसी एका नागरिकाच्या घरी आसरा घेतला होता. मात्र आता त्यांनी सुध्दा जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राहण्याचा आणि अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांनी आम्ही मोठ्या बिकट परिस्थितीत अडकलो असून महाराष्टÑ सरकारने आम्हाला काही उपाय योजना करुन गावाकडे परत येण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना माजी आ.दिलीप बन्सोड यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.........बन्सोड यांचे गृहमंत्र्यांना साकडेतिरोडा येथील आठ मजूर लखनौ आणि पंजाब येथे मागील चार दिवसांपासून अडकले आहे.त्यांना परत येण्यासाठी कुठल्या वाहनाची सोय नसल्याने राज्य सरकारने त्यांना परत आणण्यासाठी काही तरी उपाय योजना करावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधून केली असल्याचे माजी आ.दिलीप बन्सोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस