शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

Corona Virus in Gondia; लखनौ व पंजाबमध्ये अडकले गोंदियातील तिरोड्याचे मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 14:31 IST

जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नेपाळ आणि पंजाब येथे गेलेले ८ मजूर मागील चार दिवसांपासून लखनौ आणि पंजाबमध्ये अडकले आहेत. त्यांना अन्न पाणी सुध्दा मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारकडे मदतीसाठी साकडेचार दिवसांपासून संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नेपाळ आणि पंजाब येथे गेलेले ८ मजूर मागील चार दिवसांपासून लखनौ आणि पंजाबमध्ये अडकले आहेत. त्यांना अन्न पाणी सुध्दा मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. गावाकडे परत येण्यासाठी कुठल्याही साधनाची सोय नाही. तेथील स्थानिक नागरिक देखील त्यांना सहकार्य करीत नसल्याने त्यांची अडचण निर्माण झाली आहे. महाराष्टÑ सरकारने आम्हाला परत येण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी याचना त्यांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. रेल्वेसह सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे.तर जिल्हा आणि राज्याच्या सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहे. त्यामुळे बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर अनेक रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर अडकले आहेत. प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील नेतलाल कोसरे, शांतीलाल कोसरे, जितेंद्र कोसरे,निखील कोसरे, संदीप कोसरे हे नेपाळ येथे मजुरीसाठी गेले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नेपाळ सरकारने सुध्दा तेथील बाहेरील मजुरांना आपल्या गावाकडे परत जाण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे हे सर्व पाचही जण नेपाळवरुन निघाले. मात्र याच दरम्यान देशात लॉक डाऊन करण्यात आल्याने ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथे अडकले आहेत. आता त्यांना रेल्वे स्थानकावरुन सुध्दा जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अशीच परिस्थिती पंजाब येथे काम करण्यासाठी गेलेल्या दिलीप तेजराम मेश्राम, रजनीकांत रहांगडाले,चक्रधर कोसरकर यांची झाली आहे. ते सुध्दा गावाकडे परत येत असताना पंजाबमधील संडारसी, तालुका राजापुरा येथे अडकले आहे. ते एका केमिकल कंपनीत काम करण्यासाठी गेले होते. मागील तीन दिवसांपासून त्यांनी संडारसी एका नागरिकाच्या घरी आसरा घेतला होता. मात्र आता त्यांनी सुध्दा जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राहण्याचा आणि अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांनी आम्ही मोठ्या बिकट परिस्थितीत अडकलो असून महाराष्टÑ सरकारने आम्हाला काही उपाय योजना करुन गावाकडे परत येण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना माजी आ.दिलीप बन्सोड यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.........बन्सोड यांचे गृहमंत्र्यांना साकडेतिरोडा येथील आठ मजूर लखनौ आणि पंजाब येथे मागील चार दिवसांपासून अडकले आहे.त्यांना परत येण्यासाठी कुठल्या वाहनाची सोय नसल्याने राज्य सरकारने त्यांना परत आणण्यासाठी काही तरी उपाय योजना करावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधून केली असल्याचे माजी आ.दिलीप बन्सोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस