शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:29 IST

गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : अर्जुनी-मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला. सत्ताधारी पक्ष साध्या चावडी बांधकामाचाही गाजावाजा करतो. एक नाय अनेक समस्या जिल्ह्यात आहेत. लोकांना समस्या सोडविण्यासाठी संघर्ष व रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा या देशाचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच बदलवू शकते. केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन घडून आणण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्याना केले.बुधवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, केतन तुरकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, पं.स.सदस्य सुधीर साधवानी, जनार्धन काळसर्पे, रतीराम राणे, नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, भोजराम रहिले, राकेश लंजे, लोकपाल गहाणे, शिशुला हलमारे, योगेश नाकाडे, यशवत गणवीर उपस्थित होते.पटेल म्हणाले, गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती झाली. अशा युतीमुळे आमच्या पक्षाला फायदाच होतो. ८ वरुन २० वर संख्याबळ आले येणाºया काळात २८ येतील, म्हणून आम्हाला युतीची गरजच नाही. शेतकरी संकटात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोवणीच झाली नाही, जिथे रोवणी झाली तिथे पिकाला कीडीने ग्रासले गेल्या चार वर्षात धानाचे भाव दोन हजारावर गेले नाही, या सरकारची कर्जमाफीची मनस्थितीच नाही.कर्जमाफीसाठी आॅनलाईनसारखी किचकट प्रक्रिया अवलंबून शेतकºयांना वारंवार हेलपाट्या घालायला लावण्याचे काम केले. अद्यापही अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अनेक रस्त्यांचे भूमिपूजन झाले, मात्र संबंधित विभागाजवळ रस्त्याची यादी नाही. ५४०० कोटी रुपयांची रस्ते गेली कुठे? असा प्रश्नही त्यांनी केला. या मतदारसंघाचे आमदार हे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुध्दा बीआरजीएफ, आयआरडीपी, यशवंत ग्राम योजनेसारख्या विविध योजनांचा निधीच बंद झाला.आता गावांचा विकास होईलच कसा असा सवाल केला. जनधनचे गोरगरीबांना खाते उघडायला लावले मात्र या खात्यात ठणठणाट आहे. चावडीचे बांधकाम केले तर हे गाजावाजा करतात आम्ही सीएसआर मधून अनेक विकासकामे केली त्याची चर्चा साधी चर्चाही करत नाही. राजकारण करायला शेतकरी व ओबीसी दिसतो मात्र त्यांच्या समस्या दिसत नाही. विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळत नाही.अशा अनेक समस्यांचा पाढा खा. पटेल यांनी जनतेसमोर वाचला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन जे. के.काळसर्पे, प्रास्ताविक लोकपाल गहाणे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल लाडे यांनी मानले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल