शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:29 IST

गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : अर्जुनी-मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला. सत्ताधारी पक्ष साध्या चावडी बांधकामाचाही गाजावाजा करतो. एक नाय अनेक समस्या जिल्ह्यात आहेत. लोकांना समस्या सोडविण्यासाठी संघर्ष व रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा या देशाचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच बदलवू शकते. केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन घडून आणण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्याना केले.बुधवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, केतन तुरकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, पं.स.सदस्य सुधीर साधवानी, जनार्धन काळसर्पे, रतीराम राणे, नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, भोजराम रहिले, राकेश लंजे, लोकपाल गहाणे, शिशुला हलमारे, योगेश नाकाडे, यशवत गणवीर उपस्थित होते.पटेल म्हणाले, गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती झाली. अशा युतीमुळे आमच्या पक्षाला फायदाच होतो. ८ वरुन २० वर संख्याबळ आले येणाºया काळात २८ येतील, म्हणून आम्हाला युतीची गरजच नाही. शेतकरी संकटात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोवणीच झाली नाही, जिथे रोवणी झाली तिथे पिकाला कीडीने ग्रासले गेल्या चार वर्षात धानाचे भाव दोन हजारावर गेले नाही, या सरकारची कर्जमाफीची मनस्थितीच नाही.कर्जमाफीसाठी आॅनलाईनसारखी किचकट प्रक्रिया अवलंबून शेतकºयांना वारंवार हेलपाट्या घालायला लावण्याचे काम केले. अद्यापही अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अनेक रस्त्यांचे भूमिपूजन झाले, मात्र संबंधित विभागाजवळ रस्त्याची यादी नाही. ५४०० कोटी रुपयांची रस्ते गेली कुठे? असा प्रश्नही त्यांनी केला. या मतदारसंघाचे आमदार हे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुध्दा बीआरजीएफ, आयआरडीपी, यशवंत ग्राम योजनेसारख्या विविध योजनांचा निधीच बंद झाला.आता गावांचा विकास होईलच कसा असा सवाल केला. जनधनचे गोरगरीबांना खाते उघडायला लावले मात्र या खात्यात ठणठणाट आहे. चावडीचे बांधकाम केले तर हे गाजावाजा करतात आम्ही सीएसआर मधून अनेक विकासकामे केली त्याची चर्चा साधी चर्चाही करत नाही. राजकारण करायला शेतकरी व ओबीसी दिसतो मात्र त्यांच्या समस्या दिसत नाही. विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळत नाही.अशा अनेक समस्यांचा पाढा खा. पटेल यांनी जनतेसमोर वाचला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन जे. के.काळसर्पे, प्रास्ताविक लोकपाल गहाणे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल लाडे यांनी मानले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल