शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:29 IST

गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : अर्जुनी-मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला. सत्ताधारी पक्ष साध्या चावडी बांधकामाचाही गाजावाजा करतो. एक नाय अनेक समस्या जिल्ह्यात आहेत. लोकांना समस्या सोडविण्यासाठी संघर्ष व रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा या देशाचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच बदलवू शकते. केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन घडून आणण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्याना केले.बुधवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, केतन तुरकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, पं.स.सदस्य सुधीर साधवानी, जनार्धन काळसर्पे, रतीराम राणे, नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, भोजराम रहिले, राकेश लंजे, लोकपाल गहाणे, शिशुला हलमारे, योगेश नाकाडे, यशवत गणवीर उपस्थित होते.पटेल म्हणाले, गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती झाली. अशा युतीमुळे आमच्या पक्षाला फायदाच होतो. ८ वरुन २० वर संख्याबळ आले येणाºया काळात २८ येतील, म्हणून आम्हाला युतीची गरजच नाही. शेतकरी संकटात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोवणीच झाली नाही, जिथे रोवणी झाली तिथे पिकाला कीडीने ग्रासले गेल्या चार वर्षात धानाचे भाव दोन हजारावर गेले नाही, या सरकारची कर्जमाफीची मनस्थितीच नाही.कर्जमाफीसाठी आॅनलाईनसारखी किचकट प्रक्रिया अवलंबून शेतकºयांना वारंवार हेलपाट्या घालायला लावण्याचे काम केले. अद्यापही अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अनेक रस्त्यांचे भूमिपूजन झाले, मात्र संबंधित विभागाजवळ रस्त्याची यादी नाही. ५४०० कोटी रुपयांची रस्ते गेली कुठे? असा प्रश्नही त्यांनी केला. या मतदारसंघाचे आमदार हे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुध्दा बीआरजीएफ, आयआरडीपी, यशवंत ग्राम योजनेसारख्या विविध योजनांचा निधीच बंद झाला.आता गावांचा विकास होईलच कसा असा सवाल केला. जनधनचे गोरगरीबांना खाते उघडायला लावले मात्र या खात्यात ठणठणाट आहे. चावडीचे बांधकाम केले तर हे गाजावाजा करतात आम्ही सीएसआर मधून अनेक विकासकामे केली त्याची चर्चा साधी चर्चाही करत नाही. राजकारण करायला शेतकरी व ओबीसी दिसतो मात्र त्यांच्या समस्या दिसत नाही. विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळत नाही.अशा अनेक समस्यांचा पाढा खा. पटेल यांनी जनतेसमोर वाचला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन जे. के.काळसर्पे, प्रास्ताविक लोकपाल गहाणे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल लाडे यांनी मानले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल