शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटार योजनेचे काम लवकरच ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

पत्रकार परिषदेला आ.मनोहर चंद्रिकापूर,माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले गोंदिया शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी भूमिगत गटार योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना लवकर मार्गी लागावी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शहरातील ११० कोटी रुपयांच्या भूमिगत विद्युत लाईनचे काम सुध्दा लवकर सुरू करण्यात येईल.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गोंदिया-जबलपूर रेल्वे लाईन लवकरच सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या भूमिगत गटार योजनेतंर्गत गोंदिया शहरासाठी ही योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने १७५ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन दिला आहे. मात्र या योजनेचे काम अद्यापही सुरू करण्यात नव्हते. या विषयाकडे आपण स्वत: लक्ष घातले असून लवकरच ही योजना ट्रॅकवर येवून काम सुरू असल्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.६) त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला आ.मनोहर चंद्रिकापूर,माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले गोंदिया शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी भूमिगत गटार योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना लवकर मार्गी लागावी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शहरातील ११० कोटी रुपयांच्या भूमिगत विद्युत लाईनचे काम सुध्दा लवकर सुरू करण्यात येईल. यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक घेवून हा विषय सुध्दा मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी आणि प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. येत्या दोन वर्षांत महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करुन हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोंदिया-जबलपूर रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे लाईनवरुन रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार होत्या.मात्र कोरोनामुळे यात खंड निर्माण झाला आहे. रेल्वे गाड्या सुरू करण्यासंदर्भात रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासह चर्चा झाली असून त्यांनी सुध्दा याला ग्रीन सिग्नल दिला आहे. २०२० अखेर या मार्गावर रेल्वे गाड्या धावतील असे खा.पटेल यांनी यावेळी सांगितले.खरीप आणि रब्बीमध्ये विक्रमी धान खरेदीमहाविकास आघाडी सरकारने धानाला प्रती क्विंटल १८३५ हमीभाव आणि दोनशे रुपये प्रोत्साहान अनुदान व पाचशे रुपये बोनस दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाचा प्रती क्विंटल दर २५१५ रुपये मिळाला. एवढा दर प्रथमच मिळाल्याने खरीप आणि रब्बी हंगामात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विक्रमी धान खरेदी झाली. धानाचे चुकारे व बोनसचे आतापर्यंत १३०० कोटी रुपये अदा करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच खºया अर्थाने शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.