शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ग्रामपंचायतचा अधिकार डावलून संस्थेला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 07:00 IST

जिल्ह्यातील एकाच संस्थेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीत विषय मंजूरीला न ठेवणे, जाहिरात देऊन इतर संस्थांचे अर्ज न मागविणे व संस्थेने बिल्ले लावतांना ३० रुपयांऐवजी ५० रुपये घेणे यात मोठा घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याचा परशुरामकर यांनी आरोप केला आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : उपमुकाअ राठोड यांचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अधिकार नसताना किंवा शासनाचे कोणतेही आदेश नसताना ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत स्तरावरील घरांवर ‘नंबर प्लेट’ लावण्याचे काम एका संस्थेला दिले. यात सदर संस्थेने प्रति सिक्का ४० ते ५० रुपये घेऊन ऐन अडचणीच्या काळात जनतेवर भुर्दंड बसविला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून राठोड यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.जिल्ह्यात आठ पंचायत समिती असून ५५४ ग्रामपंचायत आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया घरांना ‘नंबर प्लेट’ लावण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नसून त्याची काही आवश्यकताही नाही. गरज असल्यास तो अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५४ (३) पोटकलम (१) नुसार ग्रामपंचायतला असून त्यांना हे काम करायचे आहे. परंतु येथे उलटच घडले आहे. जिल्ह्यातील एका बेरोजगार संस्थेने प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधला व त्यांना २० जूनला लेखी पत्र देण्यात आले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी कसलीही चौकशी न करता किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता किंवा जिल्ह्यात हे काम करण्यासाठी इच्छुक संस्थांसाठी जाहिरात देऊन अर्ज न मागविता ज्या संस्थेने राठोड यांच्याशी संपर्क साधला त्याच संस्थेला संपूर्ण जिल्ह्यातील २६ जून रोजी देण्यात आले. सदर काम ग्रामपंचायतने कायद्यानुसार स्वत: करुन घ्यायचे आहे. पण जिल्ह्यातील एकाच संस्थेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीत विषय मंजूरीला न ठेवणे, जाहिरात देऊन इतर संस्थांचे अर्ज न मागविणे व संस्थेने बिल्ले लावतांना ३० रुपयांऐवजी ५० रुपये घेणे यात मोठा घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याचा परशुरामकर यांनी आरोप केला आहे.विभागीय आयुक्तांकडे तक्रारयांनी २६ जून रोजी सर्व खंडविकास अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढले. सदर पत्र पंचायत समितीला प्राप्त होताच खंडविकास अधिकाºयांनी कोणतीही चौकशी न करता ग्रामसेवक व सरपंचांना निगर्मित केले. या पत्राचा आधार घेत या संस्थेने सर्व जिल्ह्यात हा गोरखधंदा सुरु करुन लाखो रुपयांची अवैध वसुली सुरु केली. यात राठोड यांचे हात बरबटले असल्याची सर्वत्र चर्चा असल्याने त्यांचा तातडीने प्रभार काढावा व चौकशी करावी, अशी मागणी परशुरामकर यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.