शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

ग्रामपंचायतचा अधिकार डावलून संस्थेला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 07:00 IST

जिल्ह्यातील एकाच संस्थेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीत विषय मंजूरीला न ठेवणे, जाहिरात देऊन इतर संस्थांचे अर्ज न मागविणे व संस्थेने बिल्ले लावतांना ३० रुपयांऐवजी ५० रुपये घेणे यात मोठा घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याचा परशुरामकर यांनी आरोप केला आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : उपमुकाअ राठोड यांचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अधिकार नसताना किंवा शासनाचे कोणतेही आदेश नसताना ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत स्तरावरील घरांवर ‘नंबर प्लेट’ लावण्याचे काम एका संस्थेला दिले. यात सदर संस्थेने प्रति सिक्का ४० ते ५० रुपये घेऊन ऐन अडचणीच्या काळात जनतेवर भुर्दंड बसविला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून राठोड यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.जिल्ह्यात आठ पंचायत समिती असून ५५४ ग्रामपंचायत आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया घरांना ‘नंबर प्लेट’ लावण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नसून त्याची काही आवश्यकताही नाही. गरज असल्यास तो अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५४ (३) पोटकलम (१) नुसार ग्रामपंचायतला असून त्यांना हे काम करायचे आहे. परंतु येथे उलटच घडले आहे. जिल्ह्यातील एका बेरोजगार संस्थेने प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधला व त्यांना २० जूनला लेखी पत्र देण्यात आले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी कसलीही चौकशी न करता किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेता किंवा जिल्ह्यात हे काम करण्यासाठी इच्छुक संस्थांसाठी जाहिरात देऊन अर्ज न मागविता ज्या संस्थेने राठोड यांच्याशी संपर्क साधला त्याच संस्थेला संपूर्ण जिल्ह्यातील २६ जून रोजी देण्यात आले. सदर काम ग्रामपंचायतने कायद्यानुसार स्वत: करुन घ्यायचे आहे. पण जिल्ह्यातील एकाच संस्थेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीत विषय मंजूरीला न ठेवणे, जाहिरात देऊन इतर संस्थांचे अर्ज न मागविणे व संस्थेने बिल्ले लावतांना ३० रुपयांऐवजी ५० रुपये घेणे यात मोठा घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याचा परशुरामकर यांनी आरोप केला आहे.विभागीय आयुक्तांकडे तक्रारयांनी २६ जून रोजी सर्व खंडविकास अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढले. सदर पत्र पंचायत समितीला प्राप्त होताच खंडविकास अधिकाºयांनी कोणतीही चौकशी न करता ग्रामसेवक व सरपंचांना निगर्मित केले. या पत्राचा आधार घेत या संस्थेने सर्व जिल्ह्यात हा गोरखधंदा सुरु करुन लाखो रुपयांची अवैध वसुली सुरु केली. यात राठोड यांचे हात बरबटले असल्याची सर्वत्र चर्चा असल्याने त्यांचा तातडीने प्रभार काढावा व चौकशी करावी, अशी मागणी परशुरामकर यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.