शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

रोजगार हमी योजनेची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:53 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील मजुरांना लवकर काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची सुरुवात खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

ठळक मुद्दे५०० मजुरांची उपस्थिती : बाहेरगावी होणारे पलायन थांबले

आॅनलाईन लोकमतइंदोरा (बुज.) : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील मजुरांना लवकर काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची सुरुवात खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.भूमिपूजन जि.प. सदस्य कैलास पटले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच समीक बन्सोड, उपसरपंच चंद्रकुमार भगत, सदस्य राजू चव्हाण, ओमन बनकर, प्रिया बावनकर, शारदा पटले, इंदू चौधरी, रहांगडाले, दुर्गा साकुरे, रुपलाल अंबुले, चतुर्भज बिसेन, विस्तार अधिकारी भायदे, राजेश मेश्राम, युवराज पटले, जयहरी साकुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कामांतर्गत खडबंदा जलाशयाच्या अर्जुनी-बोंडराणी कालव्याचे खोलीकरण व दुरुस्ती कामाची सुरुवात करण्यात आली. कामासाठी १३ लाख ३०० रुपये मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी ८३१ मजुरांची मस्टर यादी मंजूर करण्यात आली. पहिल्या दिवशी कामाची सुरुवात झाली तेव्हा ४९१ मजूर कामावर उपस्थित होते.या कामामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळाला. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गावातील मजुरांचे बाहेरगावी कामासाठी जाणे थांबले. गावातील शेतकरी, शेतमजूर यांना गावामध्येच काम उपलब्ध झाले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांनी कामावरील मजुरांना गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त ठेवावे. प्रत्येक नागरिकाने शौचालयाचा वापर करावा. महिला-पुरुषांनी उघड्यावर शौचास जाऊ नये. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.जि.प. सदस्य कैलास पटले यांनी, प्रत्येक नागरिकास १०० दिवस काम मिळावे यासाठी कामाची तरतूद करण्यात आली आहे. लोकांचे बाहेर पलायन होऊ नये म्हणून रोहयोच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक मजुराने अंग मेहनतीने काम करावे, जेणेकरुन पगारामध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम येणार नाही, याची दक्षता घ्यावी. सुंदर गाव व स्वच्छ परिसराची संकल्पना सर्वांनी साकार करावी, असे सांगितले. संचालन उपसरपंच चंद्रकुमार भगत यांनी केले. आभार सरपंच समीक बन्सोड यांनी मानले.