शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिला राष्ट्रवादी काँग्रेस करणार घागर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:50 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. १ मे पर्यंत यावर उपाययोजना न झाल्यास अर्जुनी-मोरगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घागर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य : राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील अनेक गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. १ मे पर्यंत यावर उपाययोजना न झाल्यास अर्जुनी-मोरगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घागर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी मंगळवारी (दि.२३) तहसीलदार विनोद मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यात ९८० हातपंप आहेत. यापैकी २० हातपंप बंद असून बिघाड होण्याच्या आकडेवारीत दैनंदिन वाढ होत आहे. हातपंप दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले साहित्य पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध नाही. परसटोला, नवीनटोला, घुसोबाटोला, झाशीनगर, गंधारी, सोमलपूर, चान्ना कोडका, बाकटी, पांढरवानी-माल व परसोडी रय्यत इ. गावातील हातपंप नादुरुस्त आहेत.गतवर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने तलाव व बोड्या भरल्या नाहीत. पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे देऊळगाव, सावरटोला, बाकटी, खोबी, बोळदे-करडगाव, बोदरा, बुधेवाडा, सिलेझरी, चापटी, डोंगरगाव, कवठा, वडेगाव-रेल्वे, इटखेडा, इसापूर, खामखुरा, राजोली, कादोली या गावात तिव्र पाणी टंचाई आहे.इटियाडोह व नवेगावबांध जलाशयात पाणी कमी असल्याने उन्हाळी धानपिकाला सिंचन उपलब्ध झाले नाही. या धरणांचे पाणी कालव्याद्वारे दिल्यानंतर ताडगाव, झरपडा, धाबेटेकडी, कन्हाळगाव, बुधेवाडा, इटखेडा, इसापूर, खामखुरा, हेटी, येगाव, जानवा, अरुणनगर, गौरनगर, चान्ना कोडका, मुंगली, सुरगाव, गुढरी, बाकटी व इंजोरी या गावातील विहिरीत पाणी असायचे. मात्र उन्हाळी धानपिकासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध न करुन दिल्याने विहिरीत ठणठणाट आहे.तालुक्यातील ४२ गावात स्वतंत्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना असून मागील दोन वर्षापासून शासनाकडून देखभाल दुरुस्ती अनुदान व ५० टक्के विद्युत देयकाचा प्रतिपुर्ती खर्च देण्यात आला नाही. यामुळे विद्युत बिलाची थकबाकी वाढली आहे. अशा परिस्थितीत या योजना केव्हाही बंद पडू शकतात.तालुक्यात अर्जुनी-मोरगाव, रामपुरी, सिरेगावबांध व खांबी अशा चार प्रादेशीक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या योजनांना गेल्या तीन वर्षापासून देखभाल दुरुस्ती अनुदान व ५० टक्के प्रोत्साहन अनुदान जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे या योजना बंद होण्याच्या स्थितीत आहेत.या सर्व परिस्थितीमुळे पाण्याचा हाहाकार माजण्याची दाट चिन्ह आहेत. प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करीत आहे. या संदर्भात तातडीने पाऊल उचलण्यात आले नाही तर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घागर आंदोलन करण्याचा इशारा तालुका महिला राकाँच्या अध्यक्ष तथा पं.स.सदस्य सुशीला हलमारे, निशा मस्के, निर्मला इश्वार, रंजना मडावी, माधुरी पिंपळकर, विशाखा लोथे, रत्नमाला कुटारे, पल्लवी नंदेश्वर, आनंद मडावी, नरेश नाकाडे यांनी दिला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस