शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महिला राष्ट्रवादी काँग्रेस करणार घागर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:50 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. १ मे पर्यंत यावर उपाययोजना न झाल्यास अर्जुनी-मोरगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घागर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य : राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील अनेक गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. १ मे पर्यंत यावर उपाययोजना न झाल्यास अर्जुनी-मोरगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घागर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी मंगळवारी (दि.२३) तहसीलदार विनोद मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यात ९८० हातपंप आहेत. यापैकी २० हातपंप बंद असून बिघाड होण्याच्या आकडेवारीत दैनंदिन वाढ होत आहे. हातपंप दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले साहित्य पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध नाही. परसटोला, नवीनटोला, घुसोबाटोला, झाशीनगर, गंधारी, सोमलपूर, चान्ना कोडका, बाकटी, पांढरवानी-माल व परसोडी रय्यत इ. गावातील हातपंप नादुरुस्त आहेत.गतवर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने तलाव व बोड्या भरल्या नाहीत. पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे देऊळगाव, सावरटोला, बाकटी, खोबी, बोळदे-करडगाव, बोदरा, बुधेवाडा, सिलेझरी, चापटी, डोंगरगाव, कवठा, वडेगाव-रेल्वे, इटखेडा, इसापूर, खामखुरा, राजोली, कादोली या गावात तिव्र पाणी टंचाई आहे.इटियाडोह व नवेगावबांध जलाशयात पाणी कमी असल्याने उन्हाळी धानपिकाला सिंचन उपलब्ध झाले नाही. या धरणांचे पाणी कालव्याद्वारे दिल्यानंतर ताडगाव, झरपडा, धाबेटेकडी, कन्हाळगाव, बुधेवाडा, इटखेडा, इसापूर, खामखुरा, हेटी, येगाव, जानवा, अरुणनगर, गौरनगर, चान्ना कोडका, मुंगली, सुरगाव, गुढरी, बाकटी व इंजोरी या गावातील विहिरीत पाणी असायचे. मात्र उन्हाळी धानपिकासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध न करुन दिल्याने विहिरीत ठणठणाट आहे.तालुक्यातील ४२ गावात स्वतंत्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना असून मागील दोन वर्षापासून शासनाकडून देखभाल दुरुस्ती अनुदान व ५० टक्के विद्युत देयकाचा प्रतिपुर्ती खर्च देण्यात आला नाही. यामुळे विद्युत बिलाची थकबाकी वाढली आहे. अशा परिस्थितीत या योजना केव्हाही बंद पडू शकतात.तालुक्यात अर्जुनी-मोरगाव, रामपुरी, सिरेगावबांध व खांबी अशा चार प्रादेशीक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या योजनांना गेल्या तीन वर्षापासून देखभाल दुरुस्ती अनुदान व ५० टक्के प्रोत्साहन अनुदान जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे या योजना बंद होण्याच्या स्थितीत आहेत.या सर्व परिस्थितीमुळे पाण्याचा हाहाकार माजण्याची दाट चिन्ह आहेत. प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करीत आहे. या संदर्भात तातडीने पाऊल उचलण्यात आले नाही तर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घागर आंदोलन करण्याचा इशारा तालुका महिला राकाँच्या अध्यक्ष तथा पं.स.सदस्य सुशीला हलमारे, निशा मस्के, निर्मला इश्वार, रंजना मडावी, माधुरी पिंपळकर, विशाखा लोथे, रत्नमाला कुटारे, पल्लवी नंदेश्वर, आनंद मडावी, नरेश नाकाडे यांनी दिला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस