शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जीर्णावस्थेतील घर कोसळून एक महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद  कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान  त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांनी एकच आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले व  त्यांनी  ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना  सुखरूप बाहेर काढले.

ठळक मुद्देमध्यरात्रीची घटना : कुंभरे कुटुंबीयांना तीन वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : झोपडीवजा जीर्ण झालेले घर कोसळून त्याखाली दबून महिला जखमी झाली. येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, मागील तीन वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुंभरे कुटुंबीयांना घरकुल न मिळाल्याने ही योजना कितपत यशस्वी ठरत आहे हे यातून दिसून आले. 

येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद  कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान  त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांनी एकच आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले व  त्यांनी  ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना  सुखरूप बाहेर काढले. यात वच्‍छलाबाईंची सून उर्मिला हिच्या डोळ्याला, हाताला व पायाला इजा झाली आहे.  त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुंभरे कुटुंबीय मागील तीन वर्षांपासून घरकुलच्या प्रतीक्षेत असून, यामुळेच ते तुटक्या-फुटक्या झोपडीवजा घरात वास्तव्य करीत आहेत. असे कितीतरी कुटुंबीय आजही अशाच घरांमध्ये आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाचा धोका आहेच. आम्ही अडाणी असल्यामुळे कागदपत्रांचा पाठपुरावा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला तीन वर्षांपासून अजूनही घरकुल मिळाले नाही, अशी खंत वच्‍छलाबाई यांनी व्यक्त केली आहे. तर प्रभाग क्रमांक-६ मधील नागरिकांनी अत्यंत गरजू लोकांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने १०० अत्यंत गरज असलेल्या लोकांची यादी पाठविली आहे. पूर्वी संगणीकृत झालेल्या (अ) यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळणार. त्यानंतर ब, क, ड यादीतील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळतील अशी प्रशासकीय व्यवस्था आहे. अत्यंत गरजूंना ताबडतोब घरकुल देता येत नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते. कुंभरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत तातडीने करेल असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सांगितले आहे. 

देव तारी त्याला कोण मारी ...कुंभरे यांचे घर पडल्याने त्याखाली घरातील सर्वच सदस्य दबले गेले होते. यात उर्मिला यांना मारही लागला आहे. मात्र, या ढिगाऱ्यात दबलेली साडेतीन महिन्यांची पूर्वी व अडीच वर्षांची तृप्ती या वच्‍छलाबाईंच्या दोन्ही नातींना काहीच झाले नाही व त्या सुखरूप बाहेर निघाल्या. नशीब बलवत्तर म्हणूनच या दुर्घटनेतून त्या सुखरूप बचावल्या असून, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना