शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पदाधिकारी वाहनांविनाच

By admin | Updated: October 20, 2014 23:15 IST

विधानसभेच्या निवडणुका व त्यांची मतमोजणी संपून निकालही घोषीत करण्यात आले, मात्र २२ आॅक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून परत घेण्यात

परतीचे आदेशच नाहीत : खासगी वाहनांचा वापर करताहेत पदाधिकारीगोंदिया : विधानसभेच्या निवडणुका व त्यांची मतमोजणी संपून निकालही घोषीत करण्यात आले, मात्र २२ आॅक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून परत घेण्यात आलेली शासकीय वाहने त्यांना परत करण्यात आलेली नाहीत. यामुळे या पदाधिकाऱ्यांना आपल्या खाजगी वाहनांचाच वापर करावा लागल्याचे चित्र दिसून आले.निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेतील नियमांतर्गत पदाधिकाऱ्यांकडे असलेली शासकीय वाहने निवडणूक विभागाकडून मागवून घेतली जातात. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यासह अन्य पदाधिकारी ज्यांच्याकडे शासकीय वाहने आहेत त्यांच्याकडील वाहने जिल्हा निवडणूक विभागाने मागवून घेतली होती. आता मात्र निवडणूक संपली असून निकालही घोषीत करण्यात आले आहेत. मात्र पदाधिकारी शासकीय वाहनांपासून वंचित आहेत.याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता २२ तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असून त्यानंतरही निवडणूक आयोगाकडून आदेश येईपर्यंत शासकीय वाहने परत करता येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले. यामुळे आता या पदाधिकाऱ्यांना आणखी काही दिवस आपल्या शासकीय वाहनाशिवाय जुळवून घ्यावे लागणार असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)