शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोन दिवसात रस्ते झाले खड्डे मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:02 IST

तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्याची दुरूस्ती व खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देपरिणय फुके यांचे निर्देश : नागरिकांची समस्या दूर, रस्त्याची होणार दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्याची दुरूस्ती व खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात बुजविले. दोन वर्षांपासूनची समस्या दोन दिवसात मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.आमगाव ते कामठा मार्गापैकी एक २ किमी रस्ता व दुसरा ३ किमीचा रस्ता मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे उखडला होता. यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने निधीचे कारण पुढे करीत याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम होती.सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेतली. त्यांनी लगेच आपल्या स्वीय सहायकाला पाठवून याचा पाठपुरावा करण्यास सांगितले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व स्वीय सहायकाला सदर रस्त्याची पाहणी करण्यास पाठविले. तसेच दोन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश अभियंत्याला दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरीत सुरू केले.या रस्त्याची दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचा सूचना देखील पालकमंत्री फुके यांनी अधिकाऱ्यांना केल्या. फुके यांनी रस्त्याच्या समस्येची दखल घेतल्याने दोन दिवसांची समस्या दोन दिवसात मार्गी लागल्याने आमगाव तालुक्यातील नागरिकांनी फुके यांचे आभार मानले.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुके