शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

चार दिवसांतच विरले स्वच्छता अभियान

By admin | Updated: October 8, 2014 23:27 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला

कार्यालयात पुन्हा कचरा : कर्मचारी आपल्या कामात व्यस्तगोंदिया: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला प्रतिसादही मिळाला. येथील शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने यात भाग घेत कार्यालयांत अभियान राबवून टाकले. मात्र अनेक कार्यालयात हे स्वच्छता अभियान केवळ त्या दिवसापुरतेच मर्यादित राहिले. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.स्वच्छ भारत अभियानाची ही संकल्पना कायमस्वरूपी रहावी हे अपेक्षित होते. त्यासाठीच सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली. मात्र येथील शासकीय कार्यालयांत फेरफटका मारल्यावर चार दिवसांतच स्वच्छता अभियान हवेत विरल्याचे बघावयास मिळाले. कार्यालय परिसरात कचरा दिसू लागला असून हे अभियानही अन्य अभियानांप्रमाणेच फक्त ‘चार दिन की चांदनी’ ठरल्याचे दिसले. स्वच्छतेबाबत कुणाला समजावून सांगण्यापेक्षा स्वत: पासून त्याल सुरूवात करावी या उद्देशातून पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारताचे स्वप्नसाकारण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्यांच्या या अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरासह परिसर व कार्यस्थळालाही स्वच्छ ठेवावे व त्यासाठी दिवसातले काही तास स्वच्छतेवर घालवावे अशी ही संकल्पना होती. सर्वांनीच त्यांच्या या संकल्पनेला दाद दिली व यात शाळा तसेच शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने भाग घेतला. स्वच्छतेसाठी वरिष्ठ अधिकारीही हातात झाडू घेऊन सफाईसाठी सरसावल्याचे बघावयास मिळाले. मात्र अभियानाचे चार दिवस लोटल्यानंतर कार्यालयांत डोकावून बघितल्यावर तिच स्थिती बघावयास मिळाली. कार्यालय परिसरात कचरा व घाणीचे ढिगार आढळून आले. तर काही कार्यालयांत प्लास्टीकचे कप व रिकाम्या बाटल्याही दिसून आल्या. यातून सफाई न झाल्याची साक्ष मिळाली. एकंदर चार दिवसांतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानाला बगल दिल्याचे दिसले. गोंदिया शहराची तशी खासीयत आहेच. येथे एखाद्य नवीन वस्तूला डोक्यावर धरले जाते व काही दिवसांनी त्याकडे ढुंकून पाहणारे कुणी दिसत नाही. तसलाच काहीसा प्रकार स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घडला आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. अशात त्यांनीही आणखी डोकेदुखी कशाला म्हणूनच एका दिवसातच समाधान मानून घेतल्याचे बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)