शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

चार दिवसांतच विरले स्वच्छता अभियान

By admin | Updated: October 8, 2014 23:27 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला

कार्यालयात पुन्हा कचरा : कर्मचारी आपल्या कामात व्यस्तगोंदिया: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला प्रतिसादही मिळाला. येथील शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने यात भाग घेत कार्यालयांत अभियान राबवून टाकले. मात्र अनेक कार्यालयात हे स्वच्छता अभियान केवळ त्या दिवसापुरतेच मर्यादित राहिले. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.स्वच्छ भारत अभियानाची ही संकल्पना कायमस्वरूपी रहावी हे अपेक्षित होते. त्यासाठीच सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली. मात्र येथील शासकीय कार्यालयांत फेरफटका मारल्यावर चार दिवसांतच स्वच्छता अभियान हवेत विरल्याचे बघावयास मिळाले. कार्यालय परिसरात कचरा दिसू लागला असून हे अभियानही अन्य अभियानांप्रमाणेच फक्त ‘चार दिन की चांदनी’ ठरल्याचे दिसले. स्वच्छतेबाबत कुणाला समजावून सांगण्यापेक्षा स्वत: पासून त्याल सुरूवात करावी या उद्देशातून पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारताचे स्वप्नसाकारण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्यांच्या या अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरासह परिसर व कार्यस्थळालाही स्वच्छ ठेवावे व त्यासाठी दिवसातले काही तास स्वच्छतेवर घालवावे अशी ही संकल्पना होती. सर्वांनीच त्यांच्या या संकल्पनेला दाद दिली व यात शाळा तसेच शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने भाग घेतला. स्वच्छतेसाठी वरिष्ठ अधिकारीही हातात झाडू घेऊन सफाईसाठी सरसावल्याचे बघावयास मिळाले. मात्र अभियानाचे चार दिवस लोटल्यानंतर कार्यालयांत डोकावून बघितल्यावर तिच स्थिती बघावयास मिळाली. कार्यालय परिसरात कचरा व घाणीचे ढिगार आढळून आले. तर काही कार्यालयांत प्लास्टीकचे कप व रिकाम्या बाटल्याही दिसून आल्या. यातून सफाई न झाल्याची साक्ष मिळाली. एकंदर चार दिवसांतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानाला बगल दिल्याचे दिसले. गोंदिया शहराची तशी खासीयत आहेच. येथे एखाद्य नवीन वस्तूला डोक्यावर धरले जाते व काही दिवसांनी त्याकडे ढुंकून पाहणारे कुणी दिसत नाही. तसलाच काहीसा प्रकार स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घडला आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. अशात त्यांनीही आणखी डोकेदुखी कशाला म्हणूनच एका दिवसातच समाधान मानून घेतल्याचे बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)