शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पावसाच्या आगमनाने जिल्हा ‘ठंडा ठंडा कूल कूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 20:38 IST

हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होते, तर दुसरीकडे बळीराजाची चिंता वाढत होती व पावसाअभावी शेतीची कामे ठप्प पडून होती. अशात सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागून होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जून महिना अर्धा लोटूनही जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली नसल्याने चिंतेत असलेल्या सर्वांनाच शनिवारी (दि.१८) रात्री पावसाने हजेरी लावून सुखद धक्का दिला. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्याने एकीकडे जिल्ह्याचे तापमान घसरले असून, जिल्हा ‘ठंडा ठंडा -कूल कूल’ झाला असतानाच दुसरीकडे शेतकरी कामाला लागला असून, शेतीच्या कामांनी जोर धरला आहे. हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस येणार असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निसर्गाने त्यांचा अंदाज फोल ठरविला व ७ जूनपासून मृग लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परिणामी, उन्हाळा काही संपला नव्हता व रखरखत्या उन्हामुळे जिल्हावासी त्रासून गेले होते, तर दुसरीकडे बळीराजाची चिंता वाढत होती व पावसाअभावी शेतीची कामे ठप्प पडून होती. अशात सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागून होत्या. मात्र, उशिरा का होईना पावसाने जिल्ह्यात शनिवारी (दि.१८) रात्री हजेरी लावली व त्यामुळे तापमानात घट झाली असून, उकाड्यापासून सुटका मिळाली असतानाच शेतकरीसुद्धा सुखावला असून, तो कंबर कसून काळ्या मातीत उतरला आहे. 

जिल्ह्यात ४६.९ मिमी पावसाची नोंद - जिल्ह्यात शनिवारी खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जून महिन्यातील १९ तारखेपर्यंत ४६.९ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस ७६.४ मिमी देवरी तालुक्यात नोंदण्यात आला असून, सर्वांत कमी ४३.३ मिमी पाऊस गोंदिया तालुक्यात नोंदण्यात आला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग - जिल्ह्यात आतापर्यंत पाऊस बरसला नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, आता पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतीची कामे पुन्हा एकदा जोमात सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांची आता पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाने साथ दिली, तर यंदा नक्कीच चांगले पीक घेऊन शेतकरी फायदा घेतील.

 

टॅग्स :Rainपाऊस