शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

त्या वंचितांना नियमित धान्य मिळेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अन्न योजनेचे किंवा इतर कुणालाही गहू, तांदूळ मिळत नाही.

ठळक मुद्देदुकान रद्द झाले तरी समस्या कायम : दंडारी येथील बचतगट नावापुरतेच

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मुरकुटडोह-दंडारीच्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वरुन अन्नपुरवठा विभागाने मुरकुटडोह येथील स्वस्त धान्य दुकान रद्द करुन हे धान्य दुकानाला दंडारी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडले. परंतु मूळ समस्या अजूनही कायम असून त्या वंचित गरजू लोकांना हक्काचे धान्य मिळेल काय. तसेच ज्यांचे रेशन कार्ड अद्याप बनले नाही त्यांचे कार्ड बनवून नियमित धान्य केव्हापासून दिले जाईल असे काही मूळ प्रश्न अजूनही कायम आहेत. कारण तहसील कार्यालयातील जबाबदार व्यक्ती या समस्यांना गांभीर्याने घेतांना दिसून येत नाही.नेहमी उपेक्षित असलेल्या मुरकुटडोह येथील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम ‘लोकमत’ ने केले. त्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले. अधिकारी या गावांकडे जाण्याच्या नावानेच घाबरत होते किंवा कोणते ना कोणते कारण दाखवून या गावाकडे जाण्याचे टाळत होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांना भेट दिल्यानंतर आता इतर अधिकारी कर्मचारी सुद्धा येथे पोहचले खरे, परंतु तेथील समस्यांचे निवारण लवकरात लवकर करण्यासाठी तालुक्यातील जबाबदार लोक गंभीरतेने पाऊल उचलताना दिसून येत नाही.मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अन्न योजनेचे किंवा इतर कुणालाही गहू, तांदूळ मिळत नाही.अशात आता या धान्य दुकान दंडारी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडले आहे. मात्र ज्यांची नावे नोंद आहेत, त्यांच्या पुरताच धान्य पुरवठा या दुकानाला होणार अशात या दुकानातून वंचित लोकांना धान्य देण्याचा विचार होणार का? असा प्रश्न पडतो. तसेच गरीब कल्याण योजनेचे गहू, तांदूळ सुद्धा आॅनलाईन झालेल्या लोकांसाठी पुरवठा करण्यात येईल. मग वंचित लोकांना धान्य कुठून व कसे मिळणार हा प्रश्न कायम आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी.अनेक गावात या समस्या कायमनागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित व पुरेसे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी या तालुक्यात सामान्य बाब आहे. मुरकुटडोह वगळता तालुक्यातील अनेक गावात स्वस्त धान्य दुकानदार इमानदारीने पूर्ण धान्य वाटप करीत नाही. या मागचे कारण शोधले असता काही बाबीसमोर आल्या, त्या म्हणजे तहसील कार्यालयात बसलेले संबंधीत काही कर्मचारी दर महिन्याला दुकानदाराकडून अवैध वसूली करीत असल्याचा आरोप आहे. तपासणीसाठी गेले की दुकानदाराकडून फुकटात साखर व गहू जात असल्याचा आरोप आहे.महिला बचत गट नावापुरतेचकाही गावांमध्ये महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान देण्यात आल्याचे बोलले जाते. परंतु ते बचत गट नावापुरतेच असून भलताच व्यक्ती रेशन दुकान चालवितो. मुरकुटडोहचे रद्द झालेले रेशन दुकान विदर्भ महिला व बचतगट दंडारी यांना देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात हे रेशन दुकान तेथील अंगणवाडी सेविका चालवित असल्याची माहिती आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आहे.लोकांना तहसील कार्यालयात बोलाविलेतहसील कार्यालयाच्यावतीने मुरकुटडोह येथे नुकतेच शिबिर घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु जेव्हा काही महिलांनी नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी आग्रह केला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सालेकसा येथे बोलाविले. तालुका मुख्यालयापासून मुरकुटडोहचे अंतर सुमारे ३५ किमी असून नागरिकांनी पायीच जावे लागते. मग ते ३५ किमी.चा प्रवास करीत सालेकसा कसे पोहचतील. अशात तहसीलदारांसह सबंधीत अधिकारी व कर्मचाºयांनी आपल्या कर्तव्याचे पालन करीत या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार