शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
2
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
3
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
4
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
5
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
6
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
7
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
8
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
9
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
10
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
11
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
12
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
13
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
14
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
15
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
16
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
17
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
18
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
19
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
20
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

त्या वंचितांना नियमित धान्य मिळेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अन्न योजनेचे किंवा इतर कुणालाही गहू, तांदूळ मिळत नाही.

ठळक मुद्देदुकान रद्द झाले तरी समस्या कायम : दंडारी येथील बचतगट नावापुरतेच

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मुरकुटडोह-दंडारीच्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वरुन अन्नपुरवठा विभागाने मुरकुटडोह येथील स्वस्त धान्य दुकान रद्द करुन हे धान्य दुकानाला दंडारी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडले. परंतु मूळ समस्या अजूनही कायम असून त्या वंचित गरजू लोकांना हक्काचे धान्य मिळेल काय. तसेच ज्यांचे रेशन कार्ड अद्याप बनले नाही त्यांचे कार्ड बनवून नियमित धान्य केव्हापासून दिले जाईल असे काही मूळ प्रश्न अजूनही कायम आहेत. कारण तहसील कार्यालयातील जबाबदार व्यक्ती या समस्यांना गांभीर्याने घेतांना दिसून येत नाही.नेहमी उपेक्षित असलेल्या मुरकुटडोह येथील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम ‘लोकमत’ ने केले. त्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले. अधिकारी या गावांकडे जाण्याच्या नावानेच घाबरत होते किंवा कोणते ना कोणते कारण दाखवून या गावाकडे जाण्याचे टाळत होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांना भेट दिल्यानंतर आता इतर अधिकारी कर्मचारी सुद्धा येथे पोहचले खरे, परंतु तेथील समस्यांचे निवारण लवकरात लवकर करण्यासाठी तालुक्यातील जबाबदार लोक गंभीरतेने पाऊल उचलताना दिसून येत नाही.मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अन्न योजनेचे किंवा इतर कुणालाही गहू, तांदूळ मिळत नाही.अशात आता या धान्य दुकान दंडारी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडले आहे. मात्र ज्यांची नावे नोंद आहेत, त्यांच्या पुरताच धान्य पुरवठा या दुकानाला होणार अशात या दुकानातून वंचित लोकांना धान्य देण्याचा विचार होणार का? असा प्रश्न पडतो. तसेच गरीब कल्याण योजनेचे गहू, तांदूळ सुद्धा आॅनलाईन झालेल्या लोकांसाठी पुरवठा करण्यात येईल. मग वंचित लोकांना धान्य कुठून व कसे मिळणार हा प्रश्न कायम आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी.अनेक गावात या समस्या कायमनागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित व पुरेसे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी या तालुक्यात सामान्य बाब आहे. मुरकुटडोह वगळता तालुक्यातील अनेक गावात स्वस्त धान्य दुकानदार इमानदारीने पूर्ण धान्य वाटप करीत नाही. या मागचे कारण शोधले असता काही बाबीसमोर आल्या, त्या म्हणजे तहसील कार्यालयात बसलेले संबंधीत काही कर्मचारी दर महिन्याला दुकानदाराकडून अवैध वसूली करीत असल्याचा आरोप आहे. तपासणीसाठी गेले की दुकानदाराकडून फुकटात साखर व गहू जात असल्याचा आरोप आहे.महिला बचत गट नावापुरतेचकाही गावांमध्ये महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान देण्यात आल्याचे बोलले जाते. परंतु ते बचत गट नावापुरतेच असून भलताच व्यक्ती रेशन दुकान चालवितो. मुरकुटडोहचे रद्द झालेले रेशन दुकान विदर्भ महिला व बचतगट दंडारी यांना देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात हे रेशन दुकान तेथील अंगणवाडी सेविका चालवित असल्याची माहिती आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आहे.लोकांना तहसील कार्यालयात बोलाविलेतहसील कार्यालयाच्यावतीने मुरकुटडोह येथे नुकतेच शिबिर घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु जेव्हा काही महिलांनी नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी आग्रह केला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सालेकसा येथे बोलाविले. तालुका मुख्यालयापासून मुरकुटडोहचे अंतर सुमारे ३५ किमी असून नागरिकांनी पायीच जावे लागते. मग ते ३५ किमी.चा प्रवास करीत सालेकसा कसे पोहचतील. अशात तहसीलदारांसह सबंधीत अधिकारी व कर्मचाºयांनी आपल्या कर्तव्याचे पालन करीत या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार