शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शशीकरण पहाडीजवळ वनतलाव होणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:40 IST

तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या रेंगेपार सहवनक्षेत्रातील कपांर्टमेंट नंबर ५५२ मधील शशीकरण पहाडीच्या पायथ्याशी असलेल्या वनात वन तलावाची गरज आहे. ५५२ कंपार्टमेंटच्या २ कि.मी. परिसरात कुठेही तलाव नाही. रेंगेपार तलाव, दल्लीचा फुटका बोडी या दोन पाण्याच्या साधनांवर शशीकरण पहाडी व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. अनेकदा पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वन तलावाचे काम केल्यास वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास मोठी मदत होईल. शशीकरण पहाडी परिसरात घनदाट जंगल आजही पहावयास मिळते. या जंगलात अस्वल, बिबट, हरिण, सांबर, निलगाय, वाघ, रानकुत्री, तडस, रानमांजर आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात. प्राण्यांना पिण्याचे पाण्याची सोय नसल्यामुळे बरेचदा या जंगलातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. यात प्राण्यांना जीव गमवावा लागतो. शंभर वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळात ५५२ कंपार्टमेंटमध्ये तलाव बांधल्याचे पुरावे आजही आहे. त्या तलावाची पाळ फुटली असल्यामुळे पावसाळ्यात या तलावातील पाणी सरळ जंगलात वाहून जाते. त्यामुळे या तलावाची दुरूस्ती केल्यास तलावात पाणी साठवून ठेवण्यास मदत होईल. तसेच वन्य प्राण्यांना सुध्दा पाण्याची सोय होईल. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वन तलावाची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

टॅग्स :forestजंगल