शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पक्षांनी शोधलेले सरपंच पदाचे उमेदवार परफेक्ट निघतील ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:20 IST

कोणताही पक्ष असो राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच होत असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच त्यांनाही आता परफेक्ट उमेदवाराची गरज असून ते शोध घेत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही तयारी सुरू झाली असून भेटीगाठी व जनसंपर्कावर भर दिला जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  येत्या १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच वातावरण तापले आहे. अशात परफेक्ट उमेदवाराचा पक्षांकडून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकही आपणच बेस्ट हे दाखवून देण्यासाठी तयारीला लागले आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांसाठी पार्ट्यांचे आयोजनही सुरू झाले आहे. मात्र पक्षांकडून निवडले जाणारे उमेदवार खरोखरच परफेक्ट निघणार काय? याबाबतही नागरिकांत चर्चा सुरू आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचाही समावेश होत असून येत्या १८ डिसेंबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कुठल्याची राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाही; परंतु, राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी पॅनल तयार करून निवडणूक लढविली जाते. त्यात १५व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आले आहे. शिवाय सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय पक्षांकडून जास्त रस घेतला जात आहे.  निवडणुकीला जरी वेळ असला तरी आतापासूनच जिल्ह्यात गावागावांत राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आल्याने तरुण वर्गसुद्धा आता सक्रिय झाला असून निवडणुकीला चांगलीच रंगत येत आहे. शिवाय, कोणताही पक्ष असो राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच होत असल्याने राजकीय पक्ष आणि नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच त्यांनाही आता परफेक्ट उमेदवाराची गरज असून ते शोध घेत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांकडूनही तयारी सुरू झाली असून भेटीगाठी व जनसंपर्कावर भर दिला जात आहे.  काहीही करून जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबिज करावयाच्या असल्याने नेते मंडळींकडूनही विविध फंडे आजमाविले जात आहेत. यासाठी समविचार पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेत निवडणुका लढण्याचे, बैठका घेऊन योग्य नियोजन करण्याचे  फंडे अवलंबिले जात आहेत. 

कागदपत्रांची जुळवाजुळव- निवडणूक लढवित असताना त्यासाठी आरक्षण किंवा खुले गट अशात विविध कागदपत्रांची गरज असते. यामधील एखादेही कागद सुटू नये, यासाठी इच्छुकांकडून आतापासूनच तयारी सुरू आहे. यासाठी ते संबंधित पक्ष तसेच अनुभवी व्यक्तींकडून सल्ला घेत कागपदत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी भिडून आहेत.  

कार्यकर्ता व मतदारांची आवभगत- निवडणुकीत कार्यकर्ता व मतदार या दोघांनाच विशेष महत्त्व असते. यामुळेच इच्छुकांकडून आतापासून आपल्या कार्यकर्ता व मतदारांचे आवभगत सुरू झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यासाठी पार्ट्यांना सुरुवात झाली असून नॉनव्हेजसोबत शौकिनांसाठी दारूचीही व्यवस्था केली जात आहे. कार्यकर्ता तसेच मतदार नाराज झाले नाही पाहिजे, याची खबरदारी घेतली जात आहे.  

 

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत