शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

कोरोना संसर्ग काळात रेल्वेने विशेष गाड्या सुरू करीत त्याच्या तिकीट दरात दुप्पट वाढ केली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली असताना सुध्दा विशेष गाड्या नियमित करून वाढविलेले तिकिटाचे दर कमी केले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भुर्दंड अजूनही कायम असून प्रवासी तिकीट दर केव्हा कमी होतील याकडे लक्ष लावून आहेत.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे विभागाने अद्यापही रेल्वे गाड्या सुरळीतपणे सुरू केल्या नाही. सध्या केवळ विशेषच गाड्या सुरू असून त्यातच आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नाही. या विशेेष गाड्यांना अद्यापही जनरल डबे जोडण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाहेरगावी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नसल्याने आणि जनरल डबे जोडले नसल्याने गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय रेल्वेने प्रवास करणेसुध्दा अवघड झाले आहे. रेल्वे विभागाने किमान सणासुदीच्या दिवसात तरी रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडून आणि विशेष गाड्यांचा दर्जा काढून नियमित गाड्या सुरू कराव्या, अशी अपेक्षा होती. पण प्रवाशांच्या या अपेक्षांवर रेल्वे विभागाने पूर्णपणे पाणी फेरले आहे. 

पॅसेंजर लोकल अद्यापही रुळावर नाही -  रेल्वे विभागाने मागील दीड वर्षांपासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या. इतर गाड्या सुरु केल्या पण पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू न करण्याचे कारण रेल्वेने अद्यापही स्पष्ट केले नाही. 

सुरू असलेल्या विशेष गाड्या- हावडा-मुंबई मेल- अहमदाबाद-पुरी- अजमेरी-मुरी- आझाद हिंद एक्स्प्रेस- समता एक्स्प्रेस- पुणे-हावडा मेल- जबलपूर-चांदाफोर्ट- नागपूर-रायपृूर

स्पेशल तिकिटाची खिशाला कात्री - कोरोना संसर्ग काळात रेल्वेने विशेष गाड्या सुरू करीत त्याच्या तिकीट दरात दुप्पट वाढ केली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली असताना सुध्दा विशेष गाड्या नियमित करून वाढविलेले तिकिटाचे दर कमी केले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भुर्दंड अजूनही कायम असून प्रवासी तिकीट दर केव्हा कमी होतील याकडे लक्ष लावून आहेत.

प्रवासी काय म्हणतात..........कोरोनाचे कारण पुढे करीत रेल्वे विभागाने प्रवाशांची लूट चालविली आहे. परिस्थिती सर्वसामान्य झाली असून अद्यापही नियमित गाड्या सुरू केल्या नसून विशेष गाड्यांचा दर्जा कायम ठेवून प्रवाशांच्या खिशावरील भूर्दंड कायम ठेवला आहे. ही एकप्रकारची प्रवाशांची लूटच आहे. - कान्हा गुप्ता, प्रवासी

लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आल्या नसल्याने गोरगरीब प्रवाशांना मागील दीड वर्षांपासून आर्थिक भूर्दंड बसत आहे. कोरोना काय केवळ याच गाड्यांमधून होतो काय हे सुध्दा कळायला मार्ग नाही. तर रेल्वेला अद्यापही जनरल डबे न जोडल्याने प्रवाशांना तिकिटाचा दुप्पट फटका बसत आहे.- मनीष पाल, प्रवासी

रेल्वे बोर्डाकडे बोट सणासुदीच्या काळात लोकल, पॅसेंजर आणि इतर गाड्या नियमितपणे सुरू करुन रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्यापही कुठलेही निर्देश मिळाले नाही. जोपर्यंत रेल्वे बोर्डाकडून यासंदर्भात सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत यावर काही बोलता येणार नाही. - जनसंपर्क अधिकारी रेल्वे, 

 

टॅग्स :railwayरेल्वे