शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आंदोलन मागे घेणार नाही

By admin | Updated: July 15, 2014 00:02 IST

गेल्या २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना अखेर सोमवारी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. या नोटीसमध्ये त्यांना त्वरीत कामावर रूजू होण्यास सांगण्यात आले आहे.

राज्य संघटनेचा निर्णय : ग्रामसेवकांचे आजपासून मुंबई उपोषणगोंदिया : गेल्या २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना अखेर सोमवारी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. या नोटीसमध्ये त्यांना त्वरीत कामावर रूजू होण्यास सांगण्यात आले आहे. मात्र ग्रामसेवकांच्या राज्य संघटनेने आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर १५ जुलैपासून मुंबईतील आजाद मैदान येथे ग्रामसेवक उपोषणावर बसणार आहेत. यामुळे ग्रामसेवकांचे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. वेतन त्रुटी, स्वतंत्र यंत्रणा, भत्ते यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी २ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. राज्यस्तरावर सुरू असलेल्या या आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी त्यांच्याकडील चाब्या व शिक्के पंचायत समितीत जमा केले. सुमारे ३४० ग्रामसेवक आंदोलनात सहभागी असून यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५०१ ग्राम पंचायतींचा कारभार विस्कटला आहे. अशात मात्र विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी फसगत होत आहे. तर यावर पर्यायी व्यवस्था करण्यात पंचायत विभाग अपयशी ठरल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत, ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ व जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभागी ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस धाडले होते. सोमवारी (दि.१४) या ग्रामसेवकांना नोटीस प्राप्त झाले. नोटीसमध्ये, ग्रामसेवकांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे सांगण्यात आले आहे. अन्यथा मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १५३ (ए) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत राज अधिनियमाचे कलम २६१ नुसार शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून कमी करण्याचे कळविण्यात आले आहे. असे असतानाही मात्र ग्रामसेवक आपले आंदोलन मागे घेणार नाही असा निर्णय ग्रामसेवकांच्या राज्य संघटनेने घेतला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तीक चव्हाण यांनी सांगीतले. तर आपल्या मागण्यांसाठी आता १५ जुलै पासून मुंबईतील आजाद मैदान येथे ग्रामसेवक आमरण उपोषण करणार आहेत. यात संघटनांचे जिल्हाध्यक्ष व सचिव सहभागी होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले. विभागाने ग्रामसेवकांना नोटीस देऊन आंदोलन मागे घेण्याचा दबाव निर्माण केला. मात्र यावरही ग्रामसेवक उचललेले पाऊल मागे घेण्यास तयार नसल्याने आता हे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. (शहर प्रतिनिधी)