शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कोरोना योद्धांच्या कुटुबीयांना ५० लाखांची मदत मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना योध्दांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. दोन पोलीस व महसूल विभागातील दोन कर्मचारी अश्या एकूण ११ जणांचा कोरोना योध्दा म्हणून नोकरी करताना मृत्यू झाला. या ११ पैकी पोलीस विभागाचे दोन प्रस्ताव शासनाला गेले आहेत. त्यापैकी पोलीस विभागातील दोन पैकी राजेश दोनोडे यांचा प्रस्ताव काल (दि.५) रोजी मजंूर झाला.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने स्वत:बरोबर दुसऱ्यांची घेतली काळजी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : कोरोनाच्या महामारीत लोकांची काळजी घेता घेता स्वत:चे जीवन वाहून देणाºया कोरोना योध्दांना वीर मरण पत्कारावे लागले. त्या मृत पावलेल्या योध्दांना शासनाने ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच लागू केले होते.गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना योध्दांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. दोन पोलीस व महसूल विभागातील दोन कर्मचारी अश्या एकूण ११ जणांचा कोरोना योध्दा म्हणून नोकरी करताना मृत्यू झाला. या ११ पैकी पोलीस विभागाचे दोन प्रस्ताव शासनाला गेले आहेत. त्यापैकी पोलीस विभागातील दोन पैकी राजेश दोनोडे यांचा प्रस्ताव काल (दि.५) रोजी मजंूर झाला. येत्या दोन चार दिवसात इमरान काजी यांचाही प्रस्ताव मंजूर होणार असल्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितले. सात शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला. परंतु यातील दोनच शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. पाच शिक्षकांचे प्रस्तावच आले नाहीत. जे दोन प्रस्ताव आले त्यापैकी ते दोन्ही ही शासनाच्या अटीत बसत नसल्याचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी सांगितले. कोरोना झाल्याच्या १४ दिवसात कोरोनाची नोकरी बजावली आहे का? व तो कोरोना पॉझिटिव्ह आहे का हे दोन्हीही गोष्टी चाचपणी केल्यानंतर कोरोना योध्दाचा विमा कवच दिले जात असल्याचे हिवारे यांनीे सांगितले.कोरोना योद्ध्यांना सलामराजेश दोनोडेकर्तव्य बजावताना माझ्या पतीला कोरोनाची लागण झाली.परिणामी उपचारादरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. पोलीस विभागाने तत्परता दाखवून विम्याचे ५० लाख रूपये मंजूर करवून दिल्याची माहिती किशोरी दोनोडे यांनी दिली.इमरान काजीरामनगर पोलीस ठाण्यातील इमरान काजी यांचा कोरोनाने मृत्यू झाला. अजूनपर्यंत कोरोना योध्दांचा विमा सुरक्षा कवच म्हणून शासनाने ठरविलेली रक्कम मिळाली नाही. प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले असे शबाना काजी म्हणाल्या.टाकीलाल सोनवानेघरातील आधारस्तंभच हरविल्याने उपजिवीका कशी चालवायची हा प्रश्न पुढे आहे. वडिलांच्या मृत्यूला आता महिना होत असूनही यासंदर्भात प्रस्तावही मागविले नाही,असे काटीलाल सोनावने यांचे चिरंजीव सौरभ म्हणाले.कमलकिशोर परिहारघरातील कर्तेधर्ते वडीलच असल्याने कुटुंबाचा कण मोडला.मोडलेल्या कणा कसा सावरायचा हे कळत नाही. कोरोना योध्दांना शासनाने विमा कवच देण्याचे म्हटले होते. पण माहिती मागीतली नाही असे हर्षीत परिहार म्हणाले.कोरोना योध्दांना विमा कवच म्हणून शासनाने ५० लाख रुपयांचा विमा काढला होता. यासंबंधीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल. कोरोना योध्दांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासन निश्चितच काळजी घेईल.- दीपक कुमार मीणा, जिल्हाधिकारी, गोंदिया

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या