शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुध्दपौर्णिमेला वन्यप्राणी प्रगणना

By admin | Updated: May 7, 2014 18:32 IST

वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव वन्यजीव अभयारण्यातील वन्यप्राण्यांची पाणवठ्यावरील प्रगणना

नसर्गप्रेमींसाठी सुवर्णसंधी 

वन्यजीव विभागाची जय्यत तयारी सुरू 

नवेगावबांध : वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव वन्यजीव अभयारण्यातील वन्यप्राण्यांची पाणवठ्यावरील प्रगणना येत्या १४ मे रोजी, अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आणि रात्रीला चंद्राच्या लख्ख प्रकाशात होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून सतत २६ तास होणारी ही प्रगणना निसर्गप्रेमींसाठी एक मेजवाणीच ठरणार आहे. सदर प्रगणना १४ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरु होवून १५ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत चालणार आहे. या कामासाठी नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील पाणवठ्यालगत ४९, तर नवेगाव वन्यजीव अभयारण्यात २१ मचान तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. प्रत्येक मचानीवर एक वनकर्मचारी व एका निसर्गप्रेमीला बसवून वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. ज्या निसर्गप्रेमींना या प्रगणनेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी ओळखपत्र व दोन पासपोर्ट फोटोंसह १२ मे पर्यंत उपविभागीय वनाधिकारी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान (०७१९६-२२८०५१), किंवा वनपरिक्षेत्राधिकारी स्वागत (०७१९६-२२८२८४), वनपरिक्षेत्राधिकारी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान (९६०४६४१२१६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वन्यजीव विभागातर्फे करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्‍या वन्यप्रेमींची नावे नोंदणी करुन फोटो ओळखपत्रासह त्यांना संबंधित अधिकारी मान्यता देणार आहेत. वन्यप्राणी प्रगणनेत सहभागी व्यक्तींना सर्व नियमांचे व अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. (वार्ताहर)

महिलाही होऊ शकतील सहभागी

या प्रगणनेत महिला प्रगणकासही सहभागी होता येणार आहे. मात्र त्यांना त्यांच्यासोबत एक जोडीदार ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी सदर जोडीदाराचा अर्ज आपल्या अर्जासोबत पाठवायचा आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे स्वाक्षरी केलेले दोन फोटो द्यायचे आहेत. प्रगणकांचे प्रशिक्षण हे १४ मे रोजी सकाळी ७.३० वाजता अरण्यवाचन कक्ष, नवेगावबांध येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व प्रगणकांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. त्यांना निवास, जेवन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे. मचानावर बसण्यासाठी सोबत एक दरीही स्वत:च आणायची आहे.

प्रगणकावर असणार अनेक बंधने

प्रगणनेदरम्यान मचानावर बसलेले असताना जोराने बोलण्यास, मोबाईल फोन, प्लॅश कॅमेरा, संगीत वाद्य, सर्च लाईट इत्यादी वापरण्यास मनाई राहणार आहे. सोबत शीतपेय, मांसाहारी पदार्थ, भोजन, सिगरेट/बिडी, मद्य व इतर आक्षेपार्ह वस्तू घेवून जाण्यासही मनाई राहणार आहे. मचानावर असताना निसर्गाशी एकरुप अशा रंगाचेच कपडे परिधान करावे लागणार आहेत. प्रगणकाला दिलेल्या मचानात बदल करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे एकदा मचानावर बसल्यावर प्रगणना संपेपर्यंत परत जाता येणार नाही. ठरवून दिलेल्या मार्गानेच प्रगनकाला प्रगणनास्थळी उपस्थित राहावे लागणार आहे.