शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्राच्या खुंटलेल्या विकासाला जबाबदार कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

चंद्रिकापुरे म्हणाले मागील निवडणुकीत पराभव झाल्याने आपण त्यांची खंत मानून गप्प बसलो नाही. उलट तेवढ्याच जोमाने मतदारसंघात सक्रीय झालो. कुठल्याही पदावर नसताना सुध्दा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी मला सांगण्याची गरज नसून ते मतदारांना देखील ठाऊक आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : अर्जुनी मोरगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : भाजप सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अर्जुनी मोरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र या क्षेत्रात सिंचन,पायाभूत सुविधांचा दुष्काळ आणि रोजगाराचा प्रश्न कायम असल्याची ओरड स्वत: मतदार करीत आहे. मागील पाच वर्षात या क्षेत्राचा विकास खुंटला असून याला जवाबदार कोण आहे असा सवाल अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला.निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दाभना, निमगाव, खांबी, इंजोरी, पिंपळगाव, देवलगाव, येरंडी, बाराभाटी, अरतोंडी येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होत. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,गंगाधर परशुरामकर,अविनाश काशिवार,आनंद जांभुळकर, यशवंत गणविर, दादा संग्रामे, अरूणा मेश्राम, संजय गेडाम, नरेंद्र रंगारी, गिरीश पालीवाल,आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने उपस्थित होते. मनोहर चंद्रिकापूरे यांनी काही गावांमध्ये पदयात्रा आणि काही ठिकाणी प्रचारसभा घेऊन मतदारांशी संवाद साधला.चंद्रिकापुरे म्हणाले मागील निवडणुकीत पराभव झाल्याने आपण त्यांची खंत मानून गप्प बसलो नाही. उलट तेवढ्याच जोमाने मतदारसंघात सक्रीय झालो. कुठल्याही पदावर नसताना सुध्दा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी मला सांगण्याची गरज नसून ते मतदारांना देखील ठाऊक आहे. मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळेच आपण पुन्हा निवडणूक रिंगणात आहोत.आपली ताकद आणि शिदोरी ही मतदारसंघातील मतदार आणि त्यांचे प्रेम हिच आहे.त्यामुळे तो विश्वास यापुढे सुध्दा कायम ठेवतील असा आपल्याला विश्वास आहे. या क्षेत्राचे विद्यमान लोकप्रतिनिधी मागील दहा वर्षांत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचा दावा करीत आहे. मात्र ती झाली असती तर या क्षेत्राचा चेहरा मोहरा का बदलला नाही. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे का कायम आहे? राईस पार्कची स्थापन करुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी का उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. मतदारसंघातील रस्त्यांची दुदर्शा का झाली आहे. मागील दहा वर्षांत एकही मोठा प्रकल्प या मतदारसंघात का आला नाही.या सर्व प्रश्नांची उत्तरे ते जनतेला का देत नाही असा सवालही चंद्रिकापुरे यांनी केला. त्यामुळेच आघाडी सरकारचा मोठ्या घोषणांवर नव्हे तर प्रत्यक्ष विकास कामे करण्यावर विश्वास असल्याचे सांगितले. या मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला संधी दिल्यास या क्षेत्राचा नक्कीच कायापालट करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगाव