शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रामीण रुग्णालय ठरतेय पांढरा हत्ती

By admin | Updated: October 27, 2014 22:40 IST

आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या सुविधा कुचकामी ठरत आहे. गावात सुसज्ज इमारत व सुविधा असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या

हरिदास ढोक - देवळी आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या सुविधा कुचकामी ठरत आहे. गावात सुसज्ज इमारत व सुविधा असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या लोकोपयोगी ठरत नाही. वास्तूच्या उद्घाटनापासून तर आजच्या घटकेपर्यंत दोन महिन्याचा काळ झाला तरी येथे कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही. केवळ दोन परिचारिकेच्या भरवशावर रुग्णालयाचे काम सुरू आहे. यामुळे ही इमारत येथील नागरिकांकरिता केवळ शोभेची ठरत आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून वर्धा मार्गावर साडेचार एकराचे परिसरात तीन कोटींच्या खर्चातून ग्रामीण रुग्णालाची सुसज्ज इमारत तर दीड कोटीच्या खर्चातून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. या वास्तूचे बांधकाम गत दीड वर्षापूर्वीच पूर्णत्वास येऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते; परंतु आमदार रणजीत कांबळे यांनी केलेला विकास लोकांच्या गळी ताजा-ताजा उतरविण्यासाठी या रुग्णालयाचे उद्घाटन विधानसभांच्या निवडणुकीपर्यंत ओढण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण म्हटल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाच्या निकषाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या भरती सोबतच रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, एक्सरे मशीन, शवविच्छेदनाची व्यवस्था व इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची आरोग्य विभागाची बांधीलकी आहे; परंतु आजच्या तारखेपर्यंत यापैकी कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्णालय नावापुरते राहिले आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतुद बजेटमध्ये न केल्यामुळे या रुग्णालयातील १४ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मार्च महिन्यापर्यंत खोळबंल्या आहे. रुग्णालयाला २५ ते ३० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना पहिल्या टप्प्यात फक्त १४ कर्मचाऱ्यांची तरतुद करणे, हे सुध्दा न सुटणारे कोडे आहे. या १४ कर्मचाऱ्यांमध्ये एक वैद्यकीय अधीक्षक, तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारीका, एक परिचारक व दोन चपराशांचा समावेश आहे. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोपाल नारलवार यांना याठिकाणी कागदोपत्री प्रतिनियुक्तीवर देण्यात आले; परंतु पुलगाव शहराचा कार्यभार सांभाळून त्यांना याठिकाणी वेळ देणे शक्य होत नसल्यामुळे त्यांचे प्रतिनियुक्ती नावापुरतीच ठरत आहे. ३० खाटांची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात रुग्णांची भरती गत दोन महिन्यात निरंक आहे. बाह्यरुग्ण नोंदणी सुध्दा नगन्यच आहे. शवविच्छेदनासाठी वास्तू आहे; परंतु कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे ती कुचकामी ठरत आहे. खाटा, गाद्या, प्रसूती विभाग आदींची व्यवस्था असून कर्मचाऱ्यांच्या अभावी त्या निरुपयोगी ठरत आहेत. एक्सरेची मशीन नसल्यामुळे या रुग्णालयाचा खेळखंडोबा झाला आहे. अ‍ॅम्बुलन्स नसल्यामुळे हे रुग्णालय विकासाचा पांढरा हत्ती ठरले आहे.