शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:37 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे.

शेतकऱ्यांचा शासनाला सवाल : अवकाळी पावसाने नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामातील धानाला बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात धान खराब आणि पाखड झाले. पाखड झालेले धान खरेदी केंद्रावर घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. परिणामी पाखड झालेला दोन लाख क्विंटल धान विकायचा कुठे असा प्रश्न निर्माण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे. मात्र ते सुध्दा शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मातीमोल दराने त्याची मागणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परतीच्या पावसाने तिरोडा तालुकायत ५३ हेक्टर अर्जुनी मोरगाव तालुक्यात १४७४ हेक्टर, देवरी तालुक्यात १७४ हेक्टर, आमगाव तालुक्यात १६६७ हेक्टर, सडक अर्जुनी तालुक्यात १०९६ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९५३ हेक्टरवरील पिके परतीचे पावसाने बाधित झाली आहेत. ऐन धान कापणीच्या कालावधीत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कापणी केलेले धान भिजल्याने ते पाखड झाले. याचा फटका जवळपास ३० हजारावर शेतकºयांना बसला. परतीच्या पावसामुळे शेतकºयांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. पण पाखड झालेले धान खरेदी करण्यासंदर्भात कुठलेच निर्देश शासनाने दिले नाही. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी केले जात नाही. एकट्या गोंदिया जिल्ह्यात दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. खासगी व्यापारी मातीमोल दराने पाखड धानाची मागणी करीत असल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तर हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरवरील धान पिकांना बसला. तसा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यामुळे शासनाने पाखड झालेले धान खरेदी करण्याचे निर्देश दिल्यास हजारो शेतकºयांना मदत होईल. शासनाने पाखड धान खरेदी करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात करावी अशी मागणी आहे.- गंगाधर परशुरामकरजि.प.सदस्य.