शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:37 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे.

शेतकऱ्यांचा शासनाला सवाल : अवकाळी पावसाने नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामातील धानाला बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात धान खराब आणि पाखड झाले. पाखड झालेले धान खरेदी केंद्रावर घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. परिणामी पाखड झालेला दोन लाख क्विंटल धान विकायचा कुठे असा प्रश्न निर्माण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे. मात्र ते सुध्दा शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मातीमोल दराने त्याची मागणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परतीच्या पावसाने तिरोडा तालुकायत ५३ हेक्टर अर्जुनी मोरगाव तालुक्यात १४७४ हेक्टर, देवरी तालुक्यात १७४ हेक्टर, आमगाव तालुक्यात १६६७ हेक्टर, सडक अर्जुनी तालुक्यात १०९६ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९५३ हेक्टरवरील पिके परतीचे पावसाने बाधित झाली आहेत. ऐन धान कापणीच्या कालावधीत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कापणी केलेले धान भिजल्याने ते पाखड झाले. याचा फटका जवळपास ३० हजारावर शेतकºयांना बसला. परतीच्या पावसामुळे शेतकºयांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. पण पाखड झालेले धान खरेदी करण्यासंदर्भात कुठलेच निर्देश शासनाने दिले नाही. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी केले जात नाही. एकट्या गोंदिया जिल्ह्यात दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. खासगी व्यापारी मातीमोल दराने पाखड धानाची मागणी करीत असल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तर हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरवरील धान पिकांना बसला. तसा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यामुळे शासनाने पाखड झालेले धान खरेदी करण्याचे निर्देश दिल्यास हजारो शेतकºयांना मदत होईल. शासनाने पाखड धान खरेदी करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात करावी अशी मागणी आहे.- गंगाधर परशुरामकरजि.प.सदस्य.