शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:37 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे.

शेतकऱ्यांचा शासनाला सवाल : अवकाळी पावसाने नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामातील धानाला बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात धान खराब आणि पाखड झाले. पाखड झालेले धान खरेदी केंद्रावर घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. परिणामी पाखड झालेला दोन लाख क्विंटल धान विकायचा कुठे असा प्रश्न निर्माण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे. मात्र ते सुध्दा शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मातीमोल दराने त्याची मागणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परतीच्या पावसाने तिरोडा तालुकायत ५३ हेक्टर अर्जुनी मोरगाव तालुक्यात १४७४ हेक्टर, देवरी तालुक्यात १७४ हेक्टर, आमगाव तालुक्यात १६६७ हेक्टर, सडक अर्जुनी तालुक्यात १०९६ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९५३ हेक्टरवरील पिके परतीचे पावसाने बाधित झाली आहेत. ऐन धान कापणीच्या कालावधीत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कापणी केलेले धान भिजल्याने ते पाखड झाले. याचा फटका जवळपास ३० हजारावर शेतकºयांना बसला. परतीच्या पावसामुळे शेतकºयांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. पण पाखड झालेले धान खरेदी करण्यासंदर्भात कुठलेच निर्देश शासनाने दिले नाही. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी केले जात नाही. एकट्या गोंदिया जिल्ह्यात दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. खासगी व्यापारी मातीमोल दराने पाखड धानाची मागणी करीत असल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तर हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरवरील धान पिकांना बसला. तसा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यामुळे शासनाने पाखड झालेले धान खरेदी करण्याचे निर्देश दिल्यास हजारो शेतकºयांना मदत होईल. शासनाने पाखड धान खरेदी करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात करावी अशी मागणी आहे.- गंगाधर परशुरामकरजि.प.सदस्य.