शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

महिलांचा संघर्ष केव्हा यशस्वी ठरणार?

By admin | Updated: November 9, 2014 22:33 IST

विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी मध्यम प्रकल्पाला कंत्राटात देण्याची मागणी केली जात आहे. महिला तिथे मत्स्यबीज तयार करून

गोंदिया : विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी मध्यम प्रकल्पाला कंत्राटात देण्याची मागणी केली जात आहे. महिला तिथे मत्स्यबीज तयार करून मत्स्यपालनाचा व्यवसाय करून इच्छितात. एवढेच नव्हे तर जवळच्या क्षेत्रात फलोत्पादन व धान तसेच गव्हाचा उत्पादन घेवूू घेवून आत्मनिर्भर बनू इच्छितात. परंतु त्यांच्या मागणीकडे वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यात निराशेचे सावट पसरत आहे.एका लिखीत तक्रारपत्रात विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, सन २००९ मध्ये कलपाथरी मध्यम परियोजना बनविण्यात आली. समितीने सन २०११ मध्ये मध्यम परियोजना विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परंतु त्या अधिकाऱ्याने अद्याप त्या दिशेने कसलेही पाऊल उचलले नाही. या संदर्भात लोकप्रतिनिधींनाही विनवनी करणे सुरू आहे. परंतु त्यांनीही अद्याप सतत दुर्लक्षच केले आहे. एकीकडे शासकीय अधिकारी या प्रकरणात ब्रसुद्धा काढत नाहीत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मौनावस्थेत आहेत. खा. नाना पटोले यांना निवेदन देवून याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कसलेच सार्थक प्रयत्न करण्यात आले नाही. सन २००९ मध्ये तलाव बचाव कृती समितीच्या वतीने नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्च्याचे नेतृत्व तत्कालिन आ. नाना पटोले यांनी केले होते. त्यावेळी स्वत: पटोले यांनी मासेमाऱ्यांना तलाव व जमीन देण्याची मागणी केली होती. परंतु नंतर त्यांना त्या घटनेचे विस्मरण झाल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तलावात मत्स्यबीज घातले होते. परंतु प्रशासनाची कार्यवाही त्यांच्याप्रति आताही थंडबस्त्यातच आहे. जिल्ह्यात अनेक जलाशय व तलावांचे बांधकाम शासनाने केले. परंतु एकही तलाव मत्स्यपालनासाठी महिलांना देण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या आशा नैराश्येत बदलत आहेत. (प्रतिनिधी)