शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नवेगाव खुर्दवासीयांच्या समस्यांची दखल केव्हा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेगाव खुर्द येथील गावकरी मागील काही महिन्यांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. गावातील सौर ऊर्जेवरील नळ ...

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेगाव खुर्द येथील गावकरी मागील काही महिन्यांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. गावातील सौर ऊर्जेवरील नळ योजना मागील महिनाभरापासून बंद आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. परंतु ग्रामपंचायतीने या समस्यांची अद्यापही दखल घेतली नसल्याने गावकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.

नवेगाव खुर्द येथील लोकसंख्या १२०० असून हे गाव गोंदिया जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर आहे. गावात अनेक समस्या असून त्यांची अद्यापही सोडवणूक करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली पण गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. गावातील नाल्यात केरकचरा व पाणी साचलेले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावात बऱ्याच वर्षांपासून स्मशान शेड नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. या परिसरात छोट्याशा गावात स्मशान शेड आहेत. पण या गावात नाही ही बाब फार खेदाची वाटत आहे. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाते त्याठिकाणी बोअरवेलची व्यवस्था नाही. गावातील नळ योजना व नाल्या सफाईकडे येथील सरपंच व सचिव, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या समस्यांची दखल घेऊन त्या मार्गी कोण लावणार असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे.