शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

त्यांच्या झोपडीत दिवा लागणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:05 IST

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडवा हे गाव. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला वसलेली मांग गारूडी समाजाची वस्ती. या वस्तीतील मांग गारूडी समाजाच्या लोकांना मुुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर या मागील आठ-दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देशासन प्रशासनाचे दुर्लक्ष : मांग गारूडी समाजाची वस्ती, केवळ पोकळ आश्वासनेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुडवा हे गाव. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला वसलेली मांग गारूडी समाजाची वस्ती. या वस्तीतील मांग गारूडी समाजाच्या लोकांना मुुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर या मागील आठ-दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. वस्तीतील मुले चांगल शिक्षण घेवून या प्रवाहातून बाहेर यावी, त्यांना वसतिगृहात आणि चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी सुध्दा त्या आणि त्यांचे पती धनेंद्र भुरले हे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या वस्तीमध्ये अद्यापही वीज पोहचली नसून अंधाराचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे झोपडीत दिवा त्यांच्या लागणार केव्हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मांग गारूडी समाजातील वस्तीतील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी एनएनबीवायच्या मदतीने संध्याकाळी विद्यार्थ्यांना शिकविले जाते. त्यामुळे या वस्तीतील मुलांना अक्षर ओळख होवू लागली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या वस्तीतील नागरिकांना त्यांचे अधिकारी मिळावे यासाठी सविता बेदरकर यांचा खटोटोप सुरु आहे.राजकारण्यापासून ते समाजकारण्यापर्यंत प्रत्येकांना या वस्तीत नेऊन त्यांच्या समस्यांची जाणीव करुन दिली. त्यांच्या लढ्याला थोड्याफार प्रमाणात यश आले. त्यांना आता हक्काची जागा मिळाली. मात्र त्यांच्या इतर समस्या कायम आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण करून वसवलेली ही वस्ती आता अण्णाभाऊ साठेनगर या नावाने ओळखली जाऊ लागली आहे.इंडसच्या मदतीने वस्तीत शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र ती सुद्धा बंद पडली आहे. पूर्वी मालिश करणे, दायीचे काम करणे असा पूर्वापार व्यवसाय हा समाज करायचा. मांग गारूडी समाजाच्या वस्तीत भीक मागून, कबाडी वेचून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गलीच्छ राहतात म्हणून त्यांना कोणी काम द्यायला तयार नाही.काम मिळत नाही म्हणून त्यांचे गलिच्छ राहणं सुधारत नाही. अशा दृष्टचक्रात हा समाज गुरफटलेला आहे. आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत त्यांच राहणीमान सुधारणार नाही.रोजगाराची समस्याया वस्तीतील नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न हा रोजगाराचा आहे. त्यामुळे किमान आम्हाला सफाई कामगार म्हणून तरी नोकरी द्या अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. वंचितांच्या आयुष्यात कधी उजेड येईल का? इथं नेतागिरी करण्यासाठी खूप जण येतात. पण त्यांच्या मूलभूत गरजा आणि रोजगाराच्या संधी देण्यासाठी काय करता येईल असा ठोस कार्यक्रम इथे कुणीच राबवत नाही.त्यांच्या राहणीमानावर टीका होते. पण त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी काय करता येईल का यावर कुणीच मंथन करीत नाही.पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीयेथील मांग गाऊडी वस्तीत अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील महिलांना वस्तीपासून तीन दोन कि.मी.अंतरावर पाणी आणण्यासाठी जावे लागते. निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी येणारे राजकारणी सुध्दा निवडणुकीनंतर या वस्तीकडे ढूंकूनही पाहत नाही.विजेची प्रतीक्षाचया वस्तीमध्ये अद्यापही विजेची व्यवस्था नाही.विशेष म्हणजे या वस्तीच्या बाजुलाच एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मात्र या वस्तीकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सुध्दा याकडे भटकले नाही.शौचालयाचे केवळ खड्डेचया वस्तीमध्ये स्वच्छ भारत योजनेतंर्गत शौचालयासाठी खड्डे तयार करण्यात आले. पण त्यानंतर या विभागाचे अधिकारी या वस्तीकडे भटकलेच नाही. त्यामुळे वस्तीतील नागरिकांना अजुनही उघड्यावरच शौचास जावे लागत आहे.