शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

जीआर निघाला मात्र बोनस वाटप केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 21:13 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. घोषणेनंतर तब्बल तीन महिन्याने शासनाने त्यासंबंधीचा जीआर काढला.

ठळक मुद्दे४० हजार शेतकरी प्रतीक्षेत : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. घोषणेनंतर तब्बल तीन महिन्याने शासनाने त्यासंबंधीचा जीआर काढला. मात्र बोनस वाटपाचे आदेश आणि निधी अद्यापही उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे जीआर निघाला मात्र त्याचे वाटप केव्हा करणार असा सवाल जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहे.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करते. यंदा शासनाने धानाचा हमीभाव अ दर्जाच्या धानाला १५५० रुपये जाहीर केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४० हजारावर शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यावर्षी ४ लाख ५० हजार तर आदिवासी विकास महामंडळाने ३ लाख क्विंटल धानाची खरेदी केली. मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. जवळपास ४० टक्के धानाच्या उत्पादनात घट झाल्याने खरेदीत सुध्दा घट झाली. धानाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन काढता आला नाही. त्यामुळे शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ४० हजारावर शेतकरी पात्र ठरले. शासनाने घोषणेनंतर तब्बल तीन महिन्यांनी यासंबंधीचा जीआर काढला. त्यात प्रती शेतकऱ्याला केवळ ५० क्विंटलपर्यंतच बोनस देण्याची मर्यादा लावली. याला सुध्दा आता महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासंदर्भात कुठलेच आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झालेले नाही.त्यामुळे शेतकरी बोनस आले का म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयालच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र त्यांना अधिकारी पुन्हा वाट पाहण्याचा सल्ला देत आहे. आधी बोनस देण्याचा आदेश काढण्यासाठी आणि आता बोनस वाटपाचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांनामध्ये रोष व्याप्त आहे.यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोनस वाटपासंबंधी अद्याप आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.रब्बीसाठी खरेदी केंद्र केव्हा उघडणार?जिल्ह्यात रब्बी धानाची बऱ्याच प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धान निघाले असून काही शेतकरी त्या धानाची विक्री सुध्दा करीत आहे. मात्र शासनाने रब्बीतील धान खरेदीसाठी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी