शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

‘अतिक्रमण हटाव’ची नाटकबाजी कशासाठी?

By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST

व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियातील बहुतांश रस्त्यांवर व्यापाऱ्यांचा कब्जा आहे. लोकसंख्या अनेक पटींनी वाढली तरी रस्त्यांची रूंदी वाढली नाही. उलट वाहनांच्या पार्किंगमुळे रस्ते

गोंदिया : व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियातील बहुतांश रस्त्यांवर व्यापाऱ्यांचा कब्जा आहे. लोकसंख्या अनेक पटींनी वाढली तरी रस्त्यांची रूंदी वाढली नाही. उलट वाहनांच्या पार्किंगमुळे रस्ते आणखीच छोटे पडत आहे. अशा परिस्थितीत केवळ फुटपाथवरील छोट्या दुकानदारांवर अधूनमधून होणारी ‘अतिक्रमण हटाव’ची कारवाई म्हणजे निव्वळ देखावा ठरत आहे. गोंदियाच्या मार्केट परिसराला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी अशा पद्धतीची दिखाऊ अतिक्रमण हटाव मोहीम न राबविता खऱ्या अर्थाने पक्के अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षा गोंदियातील सूज्ञ नागरिकांनी ‘लोकमत’च्या परिचर्चेत व्यक्त केली.गोंदिया शहरातील रस्ते नेहमीच वाहतुकीच्या कोंडीत अडकले असतात. यातच बेवारस जनावरे रस्त्यावर राहात असून बेशिस्त असलेले वाहनचालक वाटेल त्या ठिकाणी आपले वाहन पार्र्कींग करीत असल्याने शहरातील वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.शहरातील रस्ते आधीच अरूंद आहेत. त्यात या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. सोबतच साहित्य विकणारे ठेलेवाले या रस्त्यावर आपली अधिसत्ता गाजवतात. वाट्टेल त्या ठिकाणी ठेले उभे करून व्यवसाय करतात. शहरातील नागरिकांनाही कोणतीही शिस्त नाही. मार्केट परिसरात येणारे वाहन चालक आपले वाहन शिस्तीने लावून ठेवण्यापेक्षा कोणत्याही ठिकाणी उभे करुन खुशाल खरेदीला लागतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी बेशिस्तपणे वागणारे वाहन चालक, व्यापारी पोलिसांंना दोष देत मोकळे होतात. परंतु रस्त्यावर आपण केलेल्या अतिक्रमणाला पोलिसांनी किंवा नगरपरिषदेने हटवू नये, हा त्यांचा आग्रह असतो. व्यापाऱ्यांनी केलेल्या पक्क्या अतिक्रमणाला लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याचे नेहमी बोलले जाते. पण सर्वांनाच लोकप्रतिनिधी वाचविणार नाही. त्यामुळे कारवाईची सुरूवात कुठूनतरी करून त्यात सातत्य ठेवल्यास एक दिवस सर्वांनाच अतिक्रमण काढावे लागेल. हे केल्याशिवाय शहरातील अतिक्रमणामुळे होत असलेली घुसमट दूर होणार नाही असे मत चर्चासत्रात सहभागी नागरिकांनी मांडले. अनेक लोक नगरपरिषदेला सूचना न देता किंवा परवानगी न घेता आपल्या मनाप्रमाणे वाटेल त्या ठिकाणी होर्डीग लावून शहराला विद्रूप करीत आहेत. नगर परिषदेने होर्डींग जप्त व दंडाची कारवाई देखील केली आहे. मात्र त्यात सातत्य नसते. त्यामुळे त्याचाही वाईट परिणाम होत आहे. गोंदिया शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे जयस्तंभ चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, फुलचूर नाका, कुडवा नाका, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, शक्ती चौक, मरारटोली, गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक, काळी-पिवळी स्टॅन्ड, नेहरू चौक, पाल चौक येथे पार्इंट नेमण्यात आले असून दररोज वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात. याशिवाय दोन मार्शल वाहन व एक गस्ती पथक वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी असतात. परंतु शहरात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक व अरूंद रस्त्यांवरील अस्ताव्यस्त पार्र्कींग यामुळे वाहतुकीची समस्या कायम आहे. वाहनांच्या पार्र्किंगसाठी होत असलेला ‘पार्किंग प्लाझा’ प्रत्यक्षात उभा होण्यासाठी अजून किती दिवस लागतील याबाबतची शाश्वती कोणीच देत नाही.