शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

हमीभाव जाहीर मात्र खरेदी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 9:09 PM

केंद्र सरकारने यावर्षीच्या खरीप हंगामातील धानाला १७५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र या दराने किती क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी करायचे, याबाबतच्या सूचना अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला मिळाल्या नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे लक्ष : सरासरी उत्पादनानंतर ठरणार आकडा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने यावर्षीच्या खरीप हंगामातील धानाला १७५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र या दराने किती क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी करायचे, याबाबतच्या सूचना अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला मिळाल्या नाही. त्यामुळे हमीभाव तर जाहीर झाला मात्र खरेदी किती करायची, याचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात आहे.पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. या भागातील वातवरण व सरासरी पडणार पाऊस यामुळे धानाच्या शेतीसाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी दुसरी पिके घेण्याऐवजी धानाची लागवड करतात. पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र सर्वात अधिक ४ लाख हेक्टर आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना धान्याचे कोठार म्हटले जाते. शिवाय जिल्ह्यात राईस मिलची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगामातील धान बाजारपेठेत येण्यास अद्यापही तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र यावर्षी केंद्र सरकारने धानाचा हमीभाव १७५० रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाºयांकडून यापेक्षा अधिकचा दर मिळेल यात शंका नाही. मात्र बरेचदा बाजारपेठेत याविरुध्द चित्र असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी राज्य शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळात अंतर्गत धानाची खरेदी करते. जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ५७ धान खरेदी केंद्रावरुन ४ लाख क्विंटल धानाची खरेदी केली जाते. तर यंदा शासनाने धानाला १७५० रुपये हमीभाव जाहीर केला असून त्यासंबंधीचे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाले आहे. मात्र यात एका शेतकऱ्यांकडून या दराने किती क्विंटल धान खरेदी करायचे यासंबंधीचे कुठलेच निर्देश दिलेले नाही. त्यामुळे या विभागाचे अधिकारी सुध्दा गोंधळात आहे. धान खरेदीे केंद्र सुरु होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत वेट अ‍ॅन्ड वाच करण्याचे धोरण या विभागाने अवलंबिले आहे.अहवालानंतर निर्णयकृषी विभागाकडून दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाची प्रती हेक्टर सरासरी काढली जाते. त्याआधारावर यंदा एकरी किती क्विंटल धानाचे उत्पादन होणार याचा अंदाज वर्तविला जातो. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाला पाठविला जातो. यंदा पिकांसाठी अनुकुल वातावरण असल्याने धानासह इतर पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शासन धान खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्यांकडून हमीभावानुसार किती धान खरेदी करायचे याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.लागवड खर्चाचा विचार नाहीधानासह इतर पिकांच्या लागवड खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. धानाचा प्रती एकर लागवड खर्च १८ हजार रुपयांच्या जवळपास आहे. मात्र शासन हमीभाव जाहीर करताना बियाणे, खते, मजुरीचे वाढलेले दर याचा विचार करीत नसल्याने हमीभावात वाढ केल्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.शासनाने शेतमालाला उत्पादन खर्च जोडून दीडपट भाव देण्याची घोषणा केली. ही घोषणा केवळ नावापुरतीच राहिली. त्यानंतर धानाच्या हमीभावात वाढ केली असली तरी शेतकऱ्यांकडून हमीभावानुसार किती क्विंटल धान खरेदी करणार हे स्पष्ट केलेले नाही. मात्र शासनाने हमीभावानुसार धान खरेदीसाठी मर्यादा लावू नये.- दिलीप बन्सोड, माजी आमदार तिरोडा.