गोंदिया : ऊर्जा, शक्ती, निष्ठा, संयम, आनंद, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १५) स्थानिक विश्रामगृह परिसरात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून पूजन केले.
यात्रेचे मुख्य समन्वयक नानाजी गवळी, नितीन खंमगर, ऋषीकेश करभजन, पंकज लोखंडे, रामदास तुताले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या यात्रेची सुरुवात कर्जत जामखेड येथून ९ सप्टेंबर रोजी संत गोदळ महाराज यांच्या पावनभूमीतून झाली. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रमधून ३६ जिल्ह्यातील देव-देवता व तीर्थस्थळ, गडकिल्ले या ठिकाणी फिरणार आहे. स्वराज्य ध्वजयात्रेचे शेवट महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत विठ्ठल रुख्मिणी मंदिर पंढरपूर येथे होणार आहे. यात्रेच्या माध्यमातून नवयुवकांनी एकत्र येऊन देशासाठी काम करावे, त्यांचे आचार विचार चांगले राहावेत, युवा पिढीला इतिहासाची जाणीव व्हावी, ह्या हेतूने ही स्वराज्य ध्वजयात्रा काढण्यात आली आहे. खा. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही यात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे. या स्वराज ध्वजपूजनप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, अशोक शहारे, सतीश देशमुख, विनोद पंधरे, सचिन शेंडे, केतन तुरकर, राजू एन जैन, लता रहांगडाले, प्रतीक भालेराव, जिमी गुप्ता, विनायक शर्मा, मोहित गौतम, कपिल बावणथळे, सौरभ जायस्वाल, महेश करियार, रमण उके, सौरभ रोकडे, नागो बन्सोड, पिंटू कटरे, लखन बहेलिया, कुणाल बावणथळे, दर्पण वानखेडे, अमन घोडीचोर, मंगेश रंगारी उपस्थित होेते.