शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

आठवड्यातील पावसाने जलाशय तुडुंब

By admin | Updated: September 19, 2016 00:25 IST

जिल्ह्यातील पुजारीटोला व इटियाडोह या दोन प्रमुख जलाशयांतून शेतीला सिंचन केले जाते.

तहान भागविली : पावसाने कोटा पूर्ण केला सिंचनाचीही सोय होणार जिल्ह्यातील पुजारीटोला व इटियाडोह या दोन प्रमुख जलाशयांतून शेतीला सिंचन केले जाते. पांटबंधारे विभागाकडून शेतीच्या सिंचनासाठी तसे नियोजन केले जाते व पाणी सोडण्यात आले. मात्र पाणीसाठा कमी असल्याने त्यांनाही भविष्याची चिंता होती. अशात मागच्या आठवड्यातील पावसाने त्यांना चिंतामुक्त केले. आज प्रकल्पांत मुबलक पाणी असून यातून सिंचनाची सोय केली जाऊ शकते. गोंदिया : मागील रविवारपासून (दि.११) तीन दिवस बरसलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांची तहान भागली असून सर्वच जलाशय पाण्याने लबालब झाले आहेत. आज जिल्ह्यातील चारही प्रमुख जलाशयांत ७५ टक्केच्यावर पाणीसाठा आहे. यामुळे मात्र येणाऱ्या काळातील पाण्याची समस्या सुटणार हे विशेष. अवघा पावसाळा निघून गेला असतानाही जलाशये तहानलेलीच होती. नाममात्र पाणीसाठा असल्याने येणारा काळ कठीणच दिसून येत होता. त्यात शेतीच्या सिंचनाची सोय करावयाची असल्याने पुढे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. ‘पोळा आणि पाणी झाला भोळा’ असे म्हटले जाते. मात्र वरूणराजाने यंदा ही म्हण खोटी ठरविली. पावसाळा आता संपलाच असे दिसून येत असतानाच मात्र पावसाने दमदार एंट्री मारली. ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या तीन दिवसांत पावसाने अवघ्या जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले व आपला कोटा पूर्ण केला. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख चारही जलाशये लबालब भरली. एवढेच नव्हे तर जलाशयांचे गेट उघडून त्यातून पाणी सोडण्या इतपत वेळ आली होती. या पावसामुळे जलाशये चांगलीच फुल्ल झाली व व त्यामुळे वर्षभराची कसर पूर्ण करीत भविष्यातील पाण्याची समस्याही परतीच्या पावसाने सोडवून दिली. (शहर प्रतिनिधी)