शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आठवड्यातील पावसाने जलाशय तुडुंब

By admin | Updated: September 19, 2016 00:25 IST

जिल्ह्यातील पुजारीटोला व इटियाडोह या दोन प्रमुख जलाशयांतून शेतीला सिंचन केले जाते.

तहान भागविली : पावसाने कोटा पूर्ण केला सिंचनाचीही सोय होणार जिल्ह्यातील पुजारीटोला व इटियाडोह या दोन प्रमुख जलाशयांतून शेतीला सिंचन केले जाते. पांटबंधारे विभागाकडून शेतीच्या सिंचनासाठी तसे नियोजन केले जाते व पाणी सोडण्यात आले. मात्र पाणीसाठा कमी असल्याने त्यांनाही भविष्याची चिंता होती. अशात मागच्या आठवड्यातील पावसाने त्यांना चिंतामुक्त केले. आज प्रकल्पांत मुबलक पाणी असून यातून सिंचनाची सोय केली जाऊ शकते. गोंदिया : मागील रविवारपासून (दि.११) तीन दिवस बरसलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांची तहान भागली असून सर्वच जलाशय पाण्याने लबालब झाले आहेत. आज जिल्ह्यातील चारही प्रमुख जलाशयांत ७५ टक्केच्यावर पाणीसाठा आहे. यामुळे मात्र येणाऱ्या काळातील पाण्याची समस्या सुटणार हे विशेष. अवघा पावसाळा निघून गेला असतानाही जलाशये तहानलेलीच होती. नाममात्र पाणीसाठा असल्याने येणारा काळ कठीणच दिसून येत होता. त्यात शेतीच्या सिंचनाची सोय करावयाची असल्याने पुढे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. ‘पोळा आणि पाणी झाला भोळा’ असे म्हटले जाते. मात्र वरूणराजाने यंदा ही म्हण खोटी ठरविली. पावसाळा आता संपलाच असे दिसून येत असतानाच मात्र पावसाने दमदार एंट्री मारली. ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या तीन दिवसांत पावसाने अवघ्या जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले व आपला कोटा पूर्ण केला. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख चारही जलाशये लबालब भरली. एवढेच नव्हे तर जलाशयांचे गेट उघडून त्यातून पाणी सोडण्या इतपत वेळ आली होती. या पावसामुळे जलाशये चांगलीच फुल्ल झाली व व त्यामुळे वर्षभराची कसर पूर्ण करीत भविष्यातील पाण्याची समस्याही परतीच्या पावसाने सोडवून दिली. (शहर प्रतिनिधी)