शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:59 IST

सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ......

ठळक मुद्देआमदार पुराम यांचे प्रतिपादन : हलबा-हलबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथे हलबी-हलबा समाजाच्यावतीने आयोजीत सामुहिक विवाह सोहळयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.एन.डी.किरसान होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरत बहेकार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव सहषराम कोरोटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रावण राणा, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, नगर पंचायत उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, विवाह समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराणे व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांच्या छायाचित्राला अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी आ. पुराम यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले विचार मांडताना सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे सांगून यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैशांचा अपव्यय थांबतो व कर्जबाजारीपणापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांनी मांडले व दरवर्षी होणाऱ्या हलबा हलबी समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ््याचा आढावा सादर केला.संचालन राजेश भोयर यांनी केले. कार्यक्रमासाठी समितीच्या सर्व पदाधिकाºयांनी सहकार्य केले.जोडप्यांना भेट वस्तुचे वाटपहलबा-हलबी समाजाच्यावतीने आयोजीत या सामुहिक विवाह सोहळ्यात आठ जोडप्यांना परिणय सुत्रात बांधण्यात आले. यानंतर समितीच्या वतीने या जोडप्यांना भांडी व इतर भेट वस्तु आ. पुराम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. परिणयबद्ध झालेल्या या जोडप्यांना आर्शिवाद देण्यासाठी मोठ्या संख्येत हलबा-हलबी समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न