शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पाहरा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

१२ हजार शेतकऱ्यांचे दोन वर्षांपासून वेट अ‍ॅन्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 21:33 IST

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी : ७५ हजार ८६६ शेतकऱ्यांना लाभ, याद्यांची प्रक्रिया सुरूच

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे त्यांना गेल्या आणि यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या शेतकऱ्यांना गरज भागविण्यासाठी पुन्हा एकदा सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने २७ जून २०१७ मध्ये शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. यातंर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्यात येणार होते. तसेच पात्र ठरलेल्या शेवटच्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा मिळेपर्यंत ही योजना सुरूच राहिल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.त्यानुसार अद्यापही ग्रीन, येलो, रेड याद्या तयार करण्याचे काम प्रत्येकच जिल्ह्यात सुरू आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ८७ हजार २७३ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी दोन वर्षांत ७५ हजार ८६६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २१८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या ८७ हजार २७३ शेतकऱ्यांपैकी १२ हजार २८७ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची मागील दोन वर्षांपासून बँकामध्ये पायपीट सुरूच आहे.पीक कर्ज माफीचा आत्तापर्यंत सर्वाधिक लाभ गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६४ हजार ८११ शेतकऱ्यांना १७१ कोटी ५६ लाख रुपये, विदर्भ ग्रामीण बँकेच्या ३ हजार ८९४ शेतकऱ्यांना ११ कोटी ८६ लाख रुपये आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ हजार ५८५ सभासद शेतकऱ्यांना ३५ कोटी ७९ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु असताना अद्यापही पूर्ण पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना दररोज बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या असून त्या मंजुरीसाठी पाठविल्या असल्याचे सांगितले.पीक कर्जापासून वंचितकर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या १२ हजार २८७ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून नवीन पीक कर्जाची उचल करण्यास अडचण जात आहे. जोपर्यंत त्यांचे कर्ज खाते निरंक होत नाही तोपर्यंत बँका त्यांना नवीन पीक कर्ज देणार नाही. तर पात्र शेतकऱ्यांनी थकीत कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफी मिळण्यापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे.शेतकरी सावकारांच्या दारातमागील दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असून यासाठी पात्र ठरलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही रक्कम जमा झाली नाही. त्यांची फार कोंडी झाली आहे.जुने कर्ज निरंक झाले नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे त्यांना मागील दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामासाठी नातेवाईक आणि सावकारांकडून कर्जाची उचल करुन गरज भागावावी लागत आहे.परिणामी पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात उभा असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज