शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 21, 2017 01:37 IST

बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

टेकरी वितरिकेतील प्रकार : अपुऱ्या पाण्यामुळे पीक वाळू लागले कालीमाटी : बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदिया येथील उपविभागीय बाघ सिंचन व्यवस्थापन विभागाकडून कालीमाटी शाखेला नेहमीच अन्यायकारक वागणूक मिळत असते. कित्येकवेळा रबी हंगामाकरिता पाळी असते. पण गोंदिया येथील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात ती रद्द केल्याचे पाणी वाटप सोसायटीचे म्हणणे आहे. यावर्षी उन्हाळी हंगामाकरिता कालीमाटी वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ३० हेक्टर आर शेतातील पीक नष्ट होत आहेत. येथे नेहमीच राजकीय दबावामुळे पाणी बंद करणे किंवा गेजची पातळी कमी करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. या प्रकारासंदर्भात शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत.सदर शेतकऱ्यांच्या शेतीत वाळलेल्या पिकांचे निरीक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी गोंदिया, आ. संजय पुराम, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांना करण्यात आली आहे. सदर मागणी शेतकरी तथा माजी सरपंच धनीराम मटाले, अतुल डोये, बाबुलाल वाढई, अनिता बागडे, ज्ञानीराम बागडे, छत्रपाल कारंजेकर, बाबुलाल बागडे, लक्ष्मण बागडे, सुरज शेंडे, सुखदेव शेंडे, मनिराम मेंढे, प्रविण मटाले, अमृत मटाले, ज्ञानीराम आसोले, वारलू मटाले, मोहनलाल शेंडे, टेमराज वाढई, भुरा मटाले, राजकुमार मटाले, धनीराम वाढई, कोटेश्वर मटाले, मुनेश्वर बहेकार, मुन्ना भांडारकर, मनोहर वाढई, शांता वाढई, सुखदेव मटाले, उमराव शिवणकर, रविंद्र मटाले आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)