शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 21, 2017 01:37 IST

बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

टेकरी वितरिकेतील प्रकार : अपुऱ्या पाण्यामुळे पीक वाळू लागले कालीमाटी : बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदिया येथील उपविभागीय बाघ सिंचन व्यवस्थापन विभागाकडून कालीमाटी शाखेला नेहमीच अन्यायकारक वागणूक मिळत असते. कित्येकवेळा रबी हंगामाकरिता पाळी असते. पण गोंदिया येथील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात ती रद्द केल्याचे पाणी वाटप सोसायटीचे म्हणणे आहे. यावर्षी उन्हाळी हंगामाकरिता कालीमाटी वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ३० हेक्टर आर शेतातील पीक नष्ट होत आहेत. येथे नेहमीच राजकीय दबावामुळे पाणी बंद करणे किंवा गेजची पातळी कमी करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. या प्रकारासंदर्भात शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत.सदर शेतकऱ्यांच्या शेतीत वाळलेल्या पिकांचे निरीक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी गोंदिया, आ. संजय पुराम, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांना करण्यात आली आहे. सदर मागणी शेतकरी तथा माजी सरपंच धनीराम मटाले, अतुल डोये, बाबुलाल वाढई, अनिता बागडे, ज्ञानीराम बागडे, छत्रपाल कारंजेकर, बाबुलाल बागडे, लक्ष्मण बागडे, सुरज शेंडे, सुखदेव शेंडे, मनिराम मेंढे, प्रविण मटाले, अमृत मटाले, ज्ञानीराम आसोले, वारलू मटाले, मोहनलाल शेंडे, टेमराज वाढई, भुरा मटाले, राजकुमार मटाले, धनीराम वाढई, कोटेश्वर मटाले, मुनेश्वर बहेकार, मुन्ना भांडारकर, मनोहर वाढई, शांता वाढई, सुखदेव मटाले, उमराव शिवणकर, रविंद्र मटाले आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)