शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

पावसाळ्यापर्यंत पाण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:29 IST

येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे.

ठळक मुद्देडांगोरलीत आले पाणी : तरीही शहरात एक वेळ पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र पाण्याचा जपूनच वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून शहरात एकच वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे.शहराला डांगोरली येथून पाण्याचा पुरवठा होत असून वैनगंगा नदीत पाण्याचा साठाच नसल्याने पुजारीटोला प्रकल्पातून गोंदिया शहरासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अंभोरा जवळ कालवा फुटल्याने बाघ प्रकल्प विभागाने पुन्हा १५ तारखेला सकाळी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले. सोडलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत बुधवारी (दि.१८) रात्री १२ वाजतादरम्यान पोहचले. ९० किमी अंतर पार करायला चार दिवस लागले. विशेष म्हणजे, या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस पडला होता. त्यामुळे जास्त पाणी नदी नाल्यांनी सोखले नाही. अन्यथा आणखी एक दिवस पाण्याला डांगोरली पर्यंत पोहचण्यासाठी लागला असता.पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत १५ दिवसांसाठी संग्रहीत करण्याचे आदेश आहेत. सिंचन विभागाला पाणी बंद करण्याची सूचना तीन दिवसांपूर्वीच द्यायची आहे. अशात जर पुन्हा शहरासाठी पाणी हवे असल्यास त्याबाबतही तीन दिवसांपूर्वी सूचना द्यावी लागणार आहे. सध्या पाण्याची व्यवस्था झाली आहे, मात्र पाण्याचा अपव्यय होवू नये या दृष्टीने शहरात एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.विशेष म्हणजे, पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत येण्या पुर्वी फक्त चार-पाच दिवस एक वेळ पाणी पुरवठा करता आला असता एवढेच पाणी नदीत होते. शिवाय यावर्षी पहिल्यांदाच नदीच्या आता बनलेल्या इनवेलचे गेट तोडून पाणी पुरवठा करण्याची नौबत आली असल्याचे मजिप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी सांगीतले. मात्र सध्या नदीत १० सेमी. वाढले असल्याचेही त्यांनी सांगीतले.पडली असती १४७ जेसीबींची गरजनदीतील पाणी संपल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ५ एप्रिल रोजी डांगोरली जवळील वैनगंगा नदीचे निरीक्षण केले. याप्रसंगी त्यांनी पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी नदीत संग्रहीत करण्यासाठी तलावासारखा लांब व एक फुट खोल खड्डा तयार करण्याची सूचना दिली होती. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला असता या कामासाठी सुमारे १४७ जेसीबी लागणार होते. शिवाय पुजारीटोलाचे पाणी नदीत येण्यापुर्वी ही व्यवस्था करणे गरजेचे होते. अशात हा प्रस्ताव बाजूला ठेवावा लागल्याचे शाखा अभियंता ए.वी.बागडे यांनी सांगीतले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई