शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापर्यंत पाण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:29 IST

येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे.

ठळक मुद्देडांगोरलीत आले पाणी : तरीही शहरात एक वेळ पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र पाण्याचा जपूनच वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून शहरात एकच वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे.शहराला डांगोरली येथून पाण्याचा पुरवठा होत असून वैनगंगा नदीत पाण्याचा साठाच नसल्याने पुजारीटोला प्रकल्पातून गोंदिया शहरासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अंभोरा जवळ कालवा फुटल्याने बाघ प्रकल्प विभागाने पुन्हा १५ तारखेला सकाळी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले. सोडलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत बुधवारी (दि.१८) रात्री १२ वाजतादरम्यान पोहचले. ९० किमी अंतर पार करायला चार दिवस लागले. विशेष म्हणजे, या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस पडला होता. त्यामुळे जास्त पाणी नदी नाल्यांनी सोखले नाही. अन्यथा आणखी एक दिवस पाण्याला डांगोरली पर्यंत पोहचण्यासाठी लागला असता.पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत १५ दिवसांसाठी संग्रहीत करण्याचे आदेश आहेत. सिंचन विभागाला पाणी बंद करण्याची सूचना तीन दिवसांपूर्वीच द्यायची आहे. अशात जर पुन्हा शहरासाठी पाणी हवे असल्यास त्याबाबतही तीन दिवसांपूर्वी सूचना द्यावी लागणार आहे. सध्या पाण्याची व्यवस्था झाली आहे, मात्र पाण्याचा अपव्यय होवू नये या दृष्टीने शहरात एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.विशेष म्हणजे, पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत येण्या पुर्वी फक्त चार-पाच दिवस एक वेळ पाणी पुरवठा करता आला असता एवढेच पाणी नदीत होते. शिवाय यावर्षी पहिल्यांदाच नदीच्या आता बनलेल्या इनवेलचे गेट तोडून पाणी पुरवठा करण्याची नौबत आली असल्याचे मजिप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी सांगीतले. मात्र सध्या नदीत १० सेमी. वाढले असल्याचेही त्यांनी सांगीतले.पडली असती १४७ जेसीबींची गरजनदीतील पाणी संपल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ५ एप्रिल रोजी डांगोरली जवळील वैनगंगा नदीचे निरीक्षण केले. याप्रसंगी त्यांनी पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी नदीत संग्रहीत करण्यासाठी तलावासारखा लांब व एक फुट खोल खड्डा तयार करण्याची सूचना दिली होती. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला असता या कामासाठी सुमारे १४७ जेसीबी लागणार होते. शिवाय पुजारीटोलाचे पाणी नदीत येण्यापुर्वी ही व्यवस्था करणे गरजेचे होते. अशात हा प्रस्ताव बाजूला ठेवावा लागल्याचे शाखा अभियंता ए.वी.बागडे यांनी सांगीतले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई